शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

यशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:26 IST

पक्षीय राजकारणातून संन्यास : लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणार

पाटना : अटलबिहार वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळणारे आणि मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून भाजपाविरोधात सातत्याने टीकेचा सूर आवळणारे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपालाच राम राम ठोकला. त्यांनी पक्षीय राजकारण कायमचे सोडून लोकशाहीच्या रक्षणासाठी काम करत राहणार असल्याची घोषणाही केली.पाटना येथे झालेल्या राष्ट्रीय मंचच्या एका सभेत सिन्हा यांनी ही घोषणा केली. यावेळी भाजपचे बंडखोर नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग, आशुतोष आदी हजर होते.राष्ट्रीय पातळीवर नरेंंद्र मोदी यांचा उदय होण्याआधी यशवंत सिन्हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात असत. १९९८ ते २००४ या कालखंडात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सिन्हा यांनी परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री ही महत्त्वाची पदे सांभाळली होती.गैरव्यवस्थापनामुळे नोटाटंचाईदेशातील सध्याच्या चलन तुटवड्याबाबत सिन्हा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाला लक्ष्य केले. सिन्हा म्हणाले की, अर्थमंत्री आणि सरकारकडून सांगितल्या जाणाऱ्या साºया सबबी चुकीच्या आहेत. नोटा छपाईचा संबंध थेट देशाच्या वाढच्या जीडीपीसोबत असतो. याबाबत सरकार काहीही स्पष्टीकरण देऊ शकलेले नाही. पैसे काढून घेण्याचे प्रमाण अचानक खूप वाढल्याने चलन तुटवडा निर्माण झाला, हा युक्तीवाद कुणालाही न पटणारा आहे.मोदींवर टीकाअर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारनेच संसदेचे कामकाज न होऊ दिले नाही. अर्थ संकल्पीय अधिवेशन पूर्णपणे वाया जात असल्याची सरकारला अजिबात फिकीर नव्हती. विरोधकांची मते जाणून घेण्यासाठी या काळात पंतप्रधानांनी एकही बैठक घेतली नाही. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय मंचचे पुढे राजकीय पक्षात रुपांतर करण्याचा आमचा उद्देश नाही. परंतु देशातील सध्याच्या परिस्थितीवर जर आपण बोललो नाही तर येणाºया पिढ्या यासाठी आपल्यालाच जबाबदार धरतील.नेत्याला जाब विचारा; खासदारांना खुले पत्रमागच्या आठवड्यात यशवंत सिन्हा यांनी भाजपाच्या सर्व खासदारांना खुले पत्र लिहीले होते. त्यात सिन्हा म्हणाले होते की, २०१४ च्या निवडणुकीमध्ये आपण यूपीए सरकारला जोरदार विरोध केला आणि आपले सरकार निवडून दिले. परंतु या सरकारने आपला पुरता भ्रमनिरास केला आहे. आताजागे व्हा, आगामी निवडणुकीच्या आधी आपल्या नेत्याला जाब विचारा. तरच काही सुधारणा करणे शक्य होईल.मोदी विदेशात फिरतात; इथे पोलीस पीडितेला विचारतात कितने आदमी थे!यावेळी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, देशात बलात्कार होत आहेत आणि पोलीस पीडित मुलीला विचारत आहेत, ‘कितने आदमी थे!’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौºयावरही त्यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आज देशात अशी (मुलींवर अत्याचार होत आहेत) स्थिती आहे आणि अशी स्थिती असतानाच पंतप्रधानांना परदेश दौºयांवर जायला आवडते. महिला सन्मान काय असतो हे त्यांना माहित नाही. त्यांनी बायकोला सोडून दिलेले आहे. केवळ लोकप्रियतेसाठी त्यांनी आपल्या वयोवृद्ध आईला रांगेत उभे केले होते. स्वत:ला मुलगी नसल्याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’शी त्यांचा काय संबंध असणार?

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा