शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
4
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
5
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
6
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
7
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
8
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
9
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
10
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
11
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
12
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
13
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
14
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
15
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
16
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
17
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
18
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
19
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
20
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!

Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:21 IST

Yamuna River Flood Delhi: राजधानी दिल्लीची यमुना नदीने झोप उडवली आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणी पातळी २०७ मीटरवर पोहोचली आहे. गुरुवारी युमनेचे पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहचलं आहे. 

Yamuna Flood Delhi: देशाच्या राजधानीमध्ये यमुनेच्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली असून, संततधार पावसामुळे यमुनेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यमुन नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, २०७.४१ वर पाणी पातळी पोहोचली आहे. ६३ वर्षांत यमुनेने चौथ्यांदा ही पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. युमनेला आलेल्या पुरामुळे दिल्लीच्या नाकातोंडातच पाणी गेलं आहे. गुरूवारी सकाळी नदीचे पाणी दिल्ली मंत्रालयापर्यंत पोहोचले होते. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिल्लीतील काही भागांची अवस्था बिकट झाली आहे. मुसळधार पाऊस यमुनेला आलेला महापूर यामुळे दिल्लीतील नदीकाठचीच नाही, तर इतर ठिकाणचीही घरे पाण्यात बुडाली आहेत. 

काही ठिकाणी बंगलेही पाण्यात

पुराचा फटका बसलेल्या लोकांसाठी निवारा शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. पण, मयूर विहार फेज-१ मधील शिबिरातही पाणी शिरले आहे. स्वामी नारायण मंदिर, फुटओवर ब्रिज, सिव्हिल लाईन या भागातील बंगलेही पाण्यात बुडाले आहेत. 

राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील अलीपूरजवळ असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यात एक रिक्षा अडकला आणि चालक जखमी झाला आहे.

यमुनेच्या पुराचे पाणी आता निवारा शिबिरांमध्ये घुसून सचिवालयापर्यंत पोहचले आहे. अनेक ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. कश्मिरी गेट परिसरातही पाणी शिरले आहे. 

यमुना खवळली, घरे बुडाली

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलावर यमुना नदीची पाणी पातळी २०७.४८ मीटर इतकी नोंदवली गेली आहे. रात्री २ वाजेपासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत पाणी पातळी स्थिर होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुरात घरे बुडालेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जात आहे. काही ठिकाणी निवार शिबिरातच पाणी शिरल्याने, मोठा गोंधळ उडाला होता. राजघाटाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. रिंग रोड परिसरातील कार्यालयांबाहेरही पाणी भरले आहे. त्यातच नाल्यांच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने तेही रस्त्यावर वाहू लागले आहे. 

दिल्लीच्या मंत्रालयाजवळ असलेल्या भुयारी मार्गात वेगाने पाणी भरत होते. भुयारी मार्गातील पाणी मंत्रालयाच्या दिशेने जात होते. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

सध्या यमुनेची पाणी पातळी स्थिर आहे, मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दिल्लीतील सखल भागात त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

टॅग्स :floodपूरdelhiदिल्लीNew Delhiनवी दिल्लीriverनदीRainपाऊस