शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

देशाच्या संरक्षणासाठी आता ‘यज्ञयागा’चा आधार, भाजपा खासदाराचे देशभरातील ब्राह्मणांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:56 IST

सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थोपविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने देशाच्या संरक्षणासाठी आता यज्ञयागाचा आधार घेतला आहे.

नवी दिल्ली : सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थोपविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने देशाच्या संरक्षणासाठी आता यज्ञयागाचा आधार घेतला आहे.पाकच्या गोळीबारात जवान आणि नागरिकांचे जीव जात असताना, सत्ताधारी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पूर्व दिल्लीचे खासदार माहीश गिरी यांनी १८ ते २५ मार्चदरम्यान लाल किल्ल्यासमोरील मैदानावर देशभरातील ब्राह्मणांना बोलावून १०८ यज्ञांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमातील प्रमुख निमंत्रित आहेत. चीन, पाकिस्तानसारख्या बाह्य शत्रूंपासून आणि अंतर्गत हितशत्रूंपासून देशाचे संरक्षण व्हावे, देशाची अर्थव्यवस्था सुधारावी, भारतीयांची बौद्धिक क्षमता वाढावी, यासाठी हा महायज्ञ करण्यात येणार असल्याचे गिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तसेच डोकलाम, पूंछ आदी अस्वस्थ सीमा भागातून मातीआणि पाणी आणून यज्ञशाळा उभारण्यात येणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.श्री योगिनी पीठाच्या छत्राखाली आठ दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात हे १०८ यज्ञ होणार असून, त्यात देशभरातील ११११ ब्राह्मण, माँ पारंबा भगवती बगलमुखी यांना आहुती देणार आहेत. या कार्यक्रमासाठी वैदिक ग्राम उभारणीची जबाबदारी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे, तसेच शंकर महादेवन आणि कैलाश खैर कार्यक्रमासाठी गाणे तयार करणार आहेत. या यज्ञात मोठ्या प्रमाणात तूप हवी केले जाणार असून, हे तूप देशभरातील घराघरांत फिरून गोळा केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात रथयात्रा काढण्यात येणार आहे.नितीन देसार्इंकडे काम-वैदिक ग्राम उभारणीची जबाबदारी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक