शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

देशाच्या संरक्षणासाठी आता ‘यज्ञयागा’चा आधार, भाजपा खासदाराचे देशभरातील ब्राह्मणांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:56 IST

सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थोपविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने देशाच्या संरक्षणासाठी आता यज्ञयागाचा आधार घेतला आहे.

नवी दिल्ली : सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थोपविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने देशाच्या संरक्षणासाठी आता यज्ञयागाचा आधार घेतला आहे.पाकच्या गोळीबारात जवान आणि नागरिकांचे जीव जात असताना, सत्ताधारी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पूर्व दिल्लीचे खासदार माहीश गिरी यांनी १८ ते २५ मार्चदरम्यान लाल किल्ल्यासमोरील मैदानावर देशभरातील ब्राह्मणांना बोलावून १०८ यज्ञांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमातील प्रमुख निमंत्रित आहेत. चीन, पाकिस्तानसारख्या बाह्य शत्रूंपासून आणि अंतर्गत हितशत्रूंपासून देशाचे संरक्षण व्हावे, देशाची अर्थव्यवस्था सुधारावी, भारतीयांची बौद्धिक क्षमता वाढावी, यासाठी हा महायज्ञ करण्यात येणार असल्याचे गिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तसेच डोकलाम, पूंछ आदी अस्वस्थ सीमा भागातून मातीआणि पाणी आणून यज्ञशाळा उभारण्यात येणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.श्री योगिनी पीठाच्या छत्राखाली आठ दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात हे १०८ यज्ञ होणार असून, त्यात देशभरातील ११११ ब्राह्मण, माँ पारंबा भगवती बगलमुखी यांना आहुती देणार आहेत. या कार्यक्रमासाठी वैदिक ग्राम उभारणीची जबाबदारी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे, तसेच शंकर महादेवन आणि कैलाश खैर कार्यक्रमासाठी गाणे तयार करणार आहेत. या यज्ञात मोठ्या प्रमाणात तूप हवी केले जाणार असून, हे तूप देशभरातील घराघरांत फिरून गोळा केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात रथयात्रा काढण्यात येणार आहे.नितीन देसार्इंकडे काम-वैदिक ग्राम उभारणीची जबाबदारी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक