शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शाओमी ही स्मार्टफोन कंपनी आता कर्जही देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 10:54 IST

अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

नवी दिल्ली - अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. भारतामध्ये ही कंपनी हळूहळू आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. शाओमीने स्मार्टफोननंतर टीव्ही क्षेत्रातही पदार्पण केले आहे. त्यानंतर आता ही कंपनी वित्तीय सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. 

लवकरच शाओमीकडून बिगर बँकींग आर्थिक कंपनी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनी रिझर्व्ह बँकेची परवानगी मागणार आहे. शाओमी फायनान्शिअल सर्व्हिसेसची योजना ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे, जीवनशैली उत्पादने, वाहने, फर्निचर,भांडी आणि कार्यालयीन उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्ज देणार आहे. याशिवाय अनेक कंपन्यांना वस्तूंच्या खरेदीसाठी क्रेडिट देणार आहे. शाओमीने भारतात कर्जाची सुविधा देणारं उत्पादन याआधीही सुरू केले आहे. यावर्षी मे महिन्यामध्ये कंपनीने लँडिंग प्लॅटफॉर्म क्रेझीबीसह भागीदारी करत भारतातील पहिले कर्जाची सुविधा देणारे उत्पादन सुरू केले. 

स्वस्त स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री करत शाओमीने भारतात आपला व्यवसाय सुरू केला. काही वर्षांमध्ये भारतीय स्मार्टफोनच्या बाजारात लोकप्रिय असलेल्या सॅमसंगलाही मागे टाकले. आता शाओमी टीव्ही क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीने भारतात Mi LED टीव्हीच्या निर्मितीची घोषणा केली आहे. शाओमीने आंध्र  प्रदेशातील तिरुपती येथे एक डिक्सन टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी 32 एकर क्षेत्रात पसरली असून 850 पेक्षा जास्त कर्मचारी तेथे काम करतात. भविष्यात शाओमीच्या महत्वाकांक्षी विस्तार योजनेअंतर्गत अनेक उत्पादने बाजारात येण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलMONEYपैसा