शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक!युद्धाशिवायच भारतीय लष्कराला दरवर्षी गमावावे लागताहेत 1600 जवान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 08:28 IST

 पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नवी दिल्ली -  पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यापैकी सर्वाधिक जवानांचा मृत्यू हा रस्ते अपघात आणि आत्महत्यांमुळे होत आहे. हा आकडा काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये गमवाव्या लागणाऱ्या जवानांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. 

 जवानांच्या अशा पद्धतीने होणाऱ्या मृत्युमुळे लष्करासमोरील चिंता वाढली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले असून, या वृत्तामधील आकडेवारीमधूम हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या आकडेवारीनुसार दरवर्षी 350 जवान, नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. तर दरवर्षी सुमारे 120 जवान आत्महत्या करत आहेत. भारतात रस्ते अपघात आणि आत्महत्येमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मात्र कठोर प्रशिक्षण आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांचे अशाप्रकारे होत असलेले मृत्यू चिंताजनक आहेत. 2014 पासून लष्कर, नौदल आणि हवाई दलाने आपले सुमारे 6 हजार 500 जवान गमावले आहेत. सुमारे 11 लाख 73 हजार एवढी सैनिक संख्या असलेल्या भारतीय सैन्य दलांसाठी हा एक मोठा आकडा आहे. जवानांच्या अशाप्रकारे होणाऱ्या मृत्युंमुळे हवाई दल आणि नौदलाच्या मनुष्यबळामध्ये मोठी घट होत आहे. लष्करामध्ये युद्धात वीरमरण येणाऱ्या जवानांपेक्षा 12 पट अधिक जवान हे शारीरिक दुखापतींचे बळी ठरत आहेत. आकडेवारीनुसार 2016 मध्ये सीमारेषेवर होणारा गोळीबार आणि दहशतवादी कारवायांमध्ये 112 जवानांना वीरमरण आले होते. मात्र याच काळात सुमारे 1 हजार 480 जवान अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. यावर्षीसुद्धा सुमारे 80 जवानांना वीरमरण आले आहे. तर एक हजार 60 जवानांना अपघात, आत्महत्या आणि  इतर कारणांमुळे जीव गमवावा लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी याबाबत गेल्या महिन्यात चिंता व्यक्त केली होती. कारण  अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे लष्कराला दरवर्षी सुमारे दोन बटालियन गमवाव्या लागत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्करप्रमुखांनी याविषयी वेळीच लक्ष देण्यास सांगितले आहे.  नोकरीच्या दबावामुळे होणारे मृत्यू जसे की आत्महत्या किंवा सहकारी  आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणारी हत्या अशा कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही मोठा आहे.  जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात चालवण्यात येत असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमांमधील दीर्घकाळ सहभागामुळे जवानांवर दबाव असतो. त्याशिवाय जवानांना मिळणारे कमी वेतन, सुट्ट्या, इतर सुविधांची कमतरता यामुळेही जवान तणावाखाली असतात. या समस्या सोडवण्यासाठी जवानांचे समुपदेशन, कुटुंबासोबत राहण्याची परवानगी, सुट्ट्या मिळण्याची सुविधा आणि तक्रारींचे त्वरित निवारण्याची सुविधा देऊन जवानांच्या स्थितीत सुधारणा करता येईल.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतDeathमृत्यूindian navyभारतीय नौदलairforceहवाईदल