शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चिंताजनक!युद्धाशिवायच भारतीय लष्कराला दरवर्षी गमावावे लागताहेत 1600 जवान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 08:28 IST

 पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नवी दिल्ली -  पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यापैकी सर्वाधिक जवानांचा मृत्यू हा रस्ते अपघात आणि आत्महत्यांमुळे होत आहे. हा आकडा काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये गमवाव्या लागणाऱ्या जवानांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. 

 जवानांच्या अशा पद्धतीने होणाऱ्या मृत्युमुळे लष्करासमोरील चिंता वाढली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले असून, या वृत्तामधील आकडेवारीमधूम हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या आकडेवारीनुसार दरवर्षी 350 जवान, नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. तर दरवर्षी सुमारे 120 जवान आत्महत्या करत आहेत. भारतात रस्ते अपघात आणि आत्महत्येमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मात्र कठोर प्रशिक्षण आणि शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांचे अशाप्रकारे होत असलेले मृत्यू चिंताजनक आहेत. 2014 पासून लष्कर, नौदल आणि हवाई दलाने आपले सुमारे 6 हजार 500 जवान गमावले आहेत. सुमारे 11 लाख 73 हजार एवढी सैनिक संख्या असलेल्या भारतीय सैन्य दलांसाठी हा एक मोठा आकडा आहे. जवानांच्या अशाप्रकारे होणाऱ्या मृत्युंमुळे हवाई दल आणि नौदलाच्या मनुष्यबळामध्ये मोठी घट होत आहे. लष्करामध्ये युद्धात वीरमरण येणाऱ्या जवानांपेक्षा 12 पट अधिक जवान हे शारीरिक दुखापतींचे बळी ठरत आहेत. आकडेवारीनुसार 2016 मध्ये सीमारेषेवर होणारा गोळीबार आणि दहशतवादी कारवायांमध्ये 112 जवानांना वीरमरण आले होते. मात्र याच काळात सुमारे 1 हजार 480 जवान अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. यावर्षीसुद्धा सुमारे 80 जवानांना वीरमरण आले आहे. तर एक हजार 60 जवानांना अपघात, आत्महत्या आणि  इतर कारणांमुळे जीव गमवावा लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी याबाबत गेल्या महिन्यात चिंता व्यक्त केली होती. कारण  अपघात, आत्महत्या आणि इतर कारणांमुळे लष्कराला दरवर्षी सुमारे दोन बटालियन गमवाव्या लागत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्करप्रमुखांनी याविषयी वेळीच लक्ष देण्यास सांगितले आहे.  नोकरीच्या दबावामुळे होणारे मृत्यू जसे की आत्महत्या किंवा सहकारी  आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणारी हत्या अशा कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही मोठा आहे.  जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यात चालवण्यात येत असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमांमधील दीर्घकाळ सहभागामुळे जवानांवर दबाव असतो. त्याशिवाय जवानांना मिळणारे कमी वेतन, सुट्ट्या, इतर सुविधांची कमतरता यामुळेही जवान तणावाखाली असतात. या समस्या सोडवण्यासाठी जवानांचे समुपदेशन, कुटुंबासोबत राहण्याची परवानगी, सुट्ट्या मिळण्याची सुविधा आणि तक्रारींचे त्वरित निवारण्याची सुविधा देऊन जवानांच्या स्थितीत सुधारणा करता येईल.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतDeathमृत्यूindian navyभारतीय नौदलairforceहवाईदल