शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

लुटारूंना त्यांच्या योग्य जागी पाठवण्याचं काम सुरू आहे- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 20:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड शहरातील रांचीमध्ये विधानसभेच्या नव्या भवनाचं उद्घाटन केलं आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड शहरातील रांचीमध्ये विधानसभेच्या नव्या भवनाचं उद्घाटन केलं आहे. त्यानंतर मोदींनी किसान मानधन योजनेचा शुभारंभ केला आहे. मोदींनी अनेक विकास परियोजनांचं उद्घाटन केलं आहे. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. ते म्हणाले, आमचं सरकार प्रत्येक भारतीयाला सामाजिक सुरक्षा कवच पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मार्चपासून आम्ही अशी पेन्शन योजना राबवली आहे जी की, असंघटित क्षेत्रातील कामगारांना फायदेशीर ठरत आहे. विकास ही आमची प्राथमिकता आहे. विकासाचा आम्ही केलेल्या आश्वासनाही अजूनही ठाम आहोत. आज ज्या वेगानं देश प्रगती करतोय तो वेग थक्क करणारा असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. झारखंडमध्ये गरिबांशी निगडीत असलेल्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवल्या जात आहेत. आयुष्यमान भारतसह शेतकऱ्यांशी संबंधित योजनांची सुरुवात केली आहे. गेल्या 100 दिवसांत देशाने केवळ ट्रेलर पाहिला आहे, पिक्चर अजून बाकी आहे. जनतेची लूट करणाऱ्यांना त्यांच्या योग्य जागी पोहचवण्याचा आम्ही संकल्प केला आहे, त्यावर कामदेखील सुरू आहे आणि काही जण गेले देखील आहेत. जम्मू-काश्मीरच्या विकासावरही आमचे लक्ष केंद्रित आहे. ‘पंतप्रधान जीवन ज्योती योजना’ आणि ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ या दोन्ही योजनांशी २२ कोटींपेक्षा जास्त देशवासी जुडले असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, यातील 30 लाखांपेक्षा अधिकजण झारखंडमधीलच आहेत, असं मोदींनी सांगितलं आङे. मोदींनी साहेबगंज येथील मल्टी मॉडेल हबचे उद्घाटन केले असून, या जलमार्गाद्वारे बांगलादेश, म्यानमार व इतर काही देशांमध्येही मालाची वाहतूक करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी