जमिनीच्या वादातून महिलेस पेटविले -

By admin | Published: January 8, 2017 11:33 PM2017-01-08T23:33:25+5:302017-01-08T23:33:25+5:30

नातेपुते (सोलापूर) :शेतजमिनीच्या कारणावरून विवाहित महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार माळशिरस तालुक्यातील कारूंडे गावात घडला. या प्रकरणी गावातीलच आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरूवारी पाच जानेवारी रोजी सकाळी घडली़ जखमी महिलेस उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़

Women quarreled with land disputes | जमिनीच्या वादातून महिलेस पेटविले -

जमिनीच्या वादातून महिलेस पेटविले -

Next
तेपुते (सोलापूर) :शेतजमिनीच्या कारणावरून विवाहित महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार माळशिरस तालुक्यातील कारूंडे गावात घडला. या प्रकरणी गावातीलच आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गुरूवारी पाच जानेवारी रोजी सकाळी घडली़ जखमी महिलेस उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
कारुंडेत आशा शिवाजी लोखंडे आणि परिवाराची शेतजमीन असून या जमीनीबाबत न्यायालयीन खटला सुरू आहे़ ५ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास गावातीलच दशरथ विठोबा जगताप, सुरेश पांडुरंग जगताप, महेश सुग्रीव म्हसकर, जयराज बाजीराव म्हसकर, स्वाती राजेंद्र म्हसगुडे, लताबाई दशरथ जगताप, कल्पना सुरेश जगताप, उज्ज्वला महेश म्हसकर हे सर्वजण जमीन ताब्यात घेण्यासाठी आले होते़ मात्र खटला न्यायप्रविष्ट असल्याने आशा यांनी जमीन नांगरण्यास विरोध केला़त्याचा राग धरून सर्वांनी आशा यांना अर्वाच्य शिविगाळ करत मारहाण केली़ इतकेतच नव्हे तर सोबत आणलेले रॉकेल ओतून पेटवून देण्याचा संतापजनक प्रयत्न आरोपींनी केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Women quarreled with land disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.