शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

धक्कादायक! तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केल्याने महिलेला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 15:48 IST

तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केली म्हणून एका महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देतिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केली म्हणून एका महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील श्रावस्तीमध्ये ही घटना घडली.22 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार केली म्हणून तिला तिच्या मुलीसमोर जिवंत जाळण्यात आलं आहे. 

लखनऊ - तिहेरी तलाकविरोधी कायदा लागू झाला असला तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केली म्हणून एका महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील श्रावस्तीमध्ये ही घटना घडली आहे. 22 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार केली म्हणून तिला तिच्या मुलीसमोर जिवंत जाळण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील गद्रा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सईदा असं महिलेचं नाव असून तिचा पती नफीस याने तिला फोनवर तिहेरी तलाक दिला होता. सईदाने या विरोधात पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून नफीस आणि सईदामध्ये वाद झाला. रागाच्या भरात पतीने आपल्या कुटुंबियांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण केली आणि जिवंत जाळलं. सईदाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

सईदाचे वडील रमजान खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नफीस मुंबईत काम करतो. 6 ऑगस्टला त्याने फोनवरून सईदाला तिहेरी तलाक दिला होता. यामुळे सईदाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर 15 ऑगस्टला पुन्हा पोलिसांनी दोघांना बोलावून घेतले आणि एकमेकांसोबत राहण्याचा सल्ला दिला होता. सईदाची मुलगी फातिमाने पोलिसांना घरामध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आई-वडिलामध्ये वाद झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'माझे बाबा घरी आले आणि त्यांनी आईला घरी जाण्यास सांगितलं. त्यावरून त्या दोघांमध्ये खूप वाद झाला. त्यानंतर आजी, आजोबा आणि काकी आले. बाबांनी आईला खूप मारहाण केली आणि इतर लोकांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतलं. त्यानंतर आग लावून जाळलं' अशी माहिती सईदाची मुलगी फातिमाने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. श्रावस्तीचे पोलीस अधीक्षक आशिष श्रीवास्तव यांनी या प्रकरणी सईदाचा पती आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली. तिहेरी तलाकची तक्रार केली म्हणून मुलीला जिवंत जाळल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली आहे. याचा तपास करण्यात येत असल्याचं देखील श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. 

 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू