शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:45 IST

पंचायत सचिवालयाच्या नावाने पोल, वायर, कनेक्शन नसतानाही ८२,३५४ रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये वीज विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. पंचायत सचिवालयाच्या नावाने पोल, वायर, कनेक्शन नसतानाही ८२,३५४ रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे. हे धक्कादायक प्रकरण नकूर विधानसभा मतदारसंघातील बहरामपुरा गावाचं आहे.

गावचे सरपंच विक्रम सिंह राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत भवनाचं बांधकाम २०२३ मध्ये सुरू झाले, पण वीज विभागाने एप्रिल २०२२ पासून बिल लावण्यास सुरुवात केली. आजपर्यंत या ठिकाणी विजेचा खांब किंवा वायर बसवण्यात आलेली नाही, वीज कनेक्शनसाठी अर्ज केला नाही, तरीही विभागाने वीज कनेक्शन सुरू असल्याचा कोणताही तपास न करता खोटा रिपोर्ट सादर केला.

डिसेंबर २०२४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा माहिती मिळाली की, ७०,६९४ रुपयांचे बिल प्रलंबित आहे, तेव्हा त्यांनी वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचून या निष्काळजीपणाचा निषेध नोंदवला. असं असूनही, बिलात कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही किंवा अधिकाऱ्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. बिल सतत वाढत आहे. बिलाची रक्कम ८२,३५४ रुपयांपर्यंत वाढली आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत सरपंचांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार दिली होती की हवेत चालणारे हे कनेक्शन त्वरित बंद करावं असं म्हटलं. परंतु आजपर्यंत विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. विभागाची ही मनमानी आणि भ्रष्टाचार ही ग्रामपंचायतीला हानी पोहोचवण्याचं षड्यंत्र आहे. या अन्यायाविरुद्ध उच्च अधिकाऱ्यांकडे आवाज उठवतील आणि कायदेशीर मार्गही स्वीकारतील असं म्हटलं आहे. तसेच वीज विभागाच्या या निष्काळजीपणामुळे संपूर्ण गावात संताप पसरला आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरUttar Pradeshउत्तर प्रदेश