शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका सहकाऱ्याचा अमित शाहंना इशारा; कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा NDAतून बाहेर पडण्याचा विचार

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 30, 2020 20:21 IST

राष्ट्रीय लोकशाही पार्टीने (RLP) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारमध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकशाही पार्टीने (RLP) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा.बेनीवाल यांनी यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरच अकाली दलानेही सोडली आहे NDAची साथ.

नवी दिल्ली - केंद्र सरकारमध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकशाही पार्टीने (RLP) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, हे कृषी कायदे सरकारने मागे घेतले नही, तर आपण एनडीएसोबत राहण्यावर पुनर्विचार करू, अशी घोषणा आरएलपीचे संयोजक तथा राजस्थानातील खासदार हनुमान बेनीवाल यांनी केली आहे. बेनीवाल यांनी यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे. 

यात त्यांनी म्हटले आहे, तीनही कृषी कायदे परत घेण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी. भीषण थंडी आणि कोरोना काळात देशाचे अन्नदाते आंदोलन करत आहेत. हे सरकारसाठी अशोभनीय आहे.'' 

बेनीवाल यांनी ट्विट केले, की ''अमित शाह जी, देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या भावनांचा विचार करून, नुकतेच आणण्यात आलेल्या शेतीसंदर्भातील तीनही विधेयके तत्काळ परत घ्यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिल्लीत त्यांच्या इच्छेनुसार, चर्चेसाठी योग्य स्थान मिळावे. आरएलपी हा एनडीएतील घटक पक्ष आहे. मात्र, आरएलपीची शक्ती शेतकरी आणि जवान आहेत. यामुळे या प्रकरणात तत्काळ कारवाई केली गेली नाही, तर मला शेतकऱ्यांच्या हितासाठी एनडीएचा घटक पक्ष राहण्यावर पुनर्विचार करावा लागेल.''

कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरच अकाली दलानेही सोडली आहे NDAची साथ -या कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरच भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या अकाली दलानेही भाजपची साथ सोडली असून तो NDA तून बाहेर पडला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. हरसिमरत कौर यांनी सर्वप्रथम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. यानंतर तीन तास चाललेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बाठकीनंतर सुखबीर बादल यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. 

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच -गेल्या चार दिवसांपासून हरयाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन आंदोलनासंदर्भात चर्चा केली आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यांऐवजी मैदानात आंदोलन करावे. सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असे आवाहन शाहंनी केले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाFarmerशेतकरीagricultureशेतीRajasthanराजस्थान