शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

'माफी कशासाठी ? आम्ही माफी मागणार नाहीत'; राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 16:07 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्याची विरोधकांची विनंती फेटाळून लावली. "निलंबित खासदारांनी अद्याप त्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला नाही. खासदारांचे निलंबन मागे घेतले जाणार नाही,'' अशी स्पष्टोक्ती एम व्यंकय्या नायडूंनी दिली. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला. म्हणाला, 'माफी कशासाठी? संसदेत जनतेचे मत मांडण्यासाठी? अजिबात नाही!', असे ट्विट त्यांनी केले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संसदेत कुणी जमीनदार किंवा राजा नाही की, त्याचे आम्ही पाय धरावे. त्यांना माफी का मागून घ्यायची आहे? याला आपण बहुमताची ताकद म्हणू शकतो. राज्यसभेतील आमच्या सहकाऱ्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आम्ही सोनिया गांधी आणि टीआर बाळू यांच्या नेतृत्वाखाली सभागृहावर बहिष्कार केला. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. निलंबनाच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. 

मल्लिकार्जुन खर्गे यांनीही विरोध दर्शवला

राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनीही निलंबनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. ते म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खासदारांचे निलंबन नियमांच्या विरोधात असून ते मागे घेण्यात यावे. खासदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ द्यायला हवा. घटना गेल्या पावसाळ्यातील आहे, मग आता हा निर्णय का घेतला? असा सवाल त्यांनी केला.

भाजपचे स्पष्टीकरण

भाजप खासदार मुख्तार अब्बास नक्वी यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले की, ती घटना होऊन 3 महिने झाले. पण, अद्याप त्या खासदारांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. कोणत्या कायद्याखाली हे लोक लोकशाहीला लाजवत आहेत ? त्या खासदारांनी आधी माफी मागावी, मग पुढे बघू, असे ते म्हणाले.

या खासदारांचे निलंबन

पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ सभागृहाच्या 12 खासदारांमध्ये नावे एल्माराम करीम (माकप), फुल्लो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपून बोरा (काँग्रेस), बिनॉय बिस्वाम (सीपीआय), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस), शांत छेत्री (तृणमूल काँग्रेस), सय्यद नासीर हुसेन (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) यांचा समावेश आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उपसभापती हरिवंश यांच्या परवानगीने याबाबतचा ठराव मांडला, जो विरोधी पक्षांच्या गदारोळात सभागृहाने मंजूर केला.

पावसाळी अधिवेशनात काय घडलं होतं?11 ऑगस्टला विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटलं होतं. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आली. लोकसभेत केवळ 21 टक्के, तर राज्यसभेत केवळ 28 टक्के कामकाज झालं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा