शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 22:22 IST

पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करून आगळीक केली आहे. यामुळे भारत आता पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाण्यांवर हल्ला चढविलेला असताना पाकिस्तानने भारताच्या रहिवासी आणि सैन्याच्या ठिकाणांवर जोरदार हल्ला चढविला आहे. आत्मघाती ड्रोन आणि फायटर जेटद्वारे पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमनी ती फोल ठरविली असून आज पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक सुरु केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि एनएसए अजित डोवाल देखील चर्चा करत आहेत. 

पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करून आगळीक केली आहे. यामुळे भारत आता पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर लाहोरवर मिसाईल डागली आहेत. पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर सतत होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान, यावेळी भारतीय सैन्याने अचूक प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली आहे. दोन्ही बाजूंमध्ये तोफखाना आणि रॉकेटचा जोरदार मारा केला जात आहे. 

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील सुईगम आणि वाव भागातील सीमावर्ती गावांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. पंजाबमधील जालंधर येथील सुरानुसी ऑर्डनन्स फॅक्टरीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला आहे. जालंधर येथील आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेजवळ ते रोखण्यात आले, ज्यामुळे मोठा हल्ला टळला. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा जोरदार तोफांचा मारा सुरू आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान