शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वरुण गांधी लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देणार, तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 21:19 IST

Varun Gandhi News: पक्षनेतृत्वावर नाराज असलेले Varun Gandhi हे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन Trinamool Congressमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वरुण गांधी हे सध्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

नवी दिल्ली - भाजपाच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक असलेले वरुण गांधी गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. तसेच ते केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, पक्षनेतृत्वावर नाराज असलेले वरुण गांधी हे लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वरुण गांधी हे सध्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. तसेच पुढच्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आहे.

वरुण गांधी हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. तसेत आपल्या वक्तव्यामधून भाजपा आणि भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारांवर टीका करत असतात. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाजपाच्या कार्यकारिणीमधूनही वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून वरुण गांधी भाजपाविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती. तसेच महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य दिनावरून सोशल मीडियावर आक्रमकपणे भूमिका मांडली होती.

पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस देशभरात काँग्रेसला पर्याय ठरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हिंदी भाषी आणि अन्य राज्यांमध्ये प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ममता बॅनर्जी पुढच्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. त्यादरम्यान वरुण गांधी यांच्यासोबत त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये एका प्रस्थापित नेत्याचा शोध तृणमूल काँग्रेसकडूनही घेण्यात येत आहे.

दुसरीकडे वरुण गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशमधील प्रभारी प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा झाल्याची चर्चाही उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र त्या चर्चेचे परिणाम अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, याबाबत भाजपाच्या नेत्याने सांगितले की, वरुण गांधींची प्रियंका गांधींशी भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र जर त्यांनी पक्ष सोडला तर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांना अधिक पर्याय नाही आहेत. तसेच हिंदी भाषिक राज्यांमध्ये पकड मिळवण्यासाठी तृणमूल काँग्रेसला थोडा वेळ लागणार आहे.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस