शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

आप- काँग्रेसच्या मतांची बेरीज यावेळी भाजपला दणका देणार?मतांची विभागणी दिल्लीत आतापर्यंत ठरली निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:17 IST

दिल्लीच्या राजकारणात सुंभ जळूनही पीळ न गेलेल्या काँग्रेसशी ‘आप’ने केलेली युती भाजपला शह देण्यात कितपत उपयुक्त ठरते हे या निवडणुकीत दिसणार आहे.

दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी यंदा भाजप, काँग्रेस आणि आप या देशातील तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणारी झुंज लक्षणीय ठरणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत लोकसभेत भाजपचे, तर विधानसभेत ‘आप’ने वर्चस्व गाजविले आहे. दिल्लीच्या राजकारणात सुंभ जळूनही पीळ न गेलेल्या काँग्रेसशी ‘आप’ने केलेली युती भाजपला शह देण्यात कितपत उपयुक्त ठरते हे या निवडणुकीत दिसणार आहे.

‘आप’ आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष- दिल्लीत काँग्रेसची मक्तेदारी संपविल्यानंतर ‘आप’ आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. २०१९च्या लोकसभेत भाजपने गेल्या दहा  वर्षातील ५६.८९ टक्के मतांच्या उच्चांकासह सलग दुसऱ्यांदा सातही जागा जिंकल्या.-  त्यावेळी काँग्रेस (२२.५ टक्के) आणि ‘आप’ (१८.१ टक्के) यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा १६.४९ टक्के मते जास्त मिळवून भाजपचे सर्व उमेदवार विजयी ठरले होते. - २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ (३२.९० टक्के) आणि काँग्रेस (१५.१० टक्के) यांच्या मतांची विभागणी ४६.४० टक्के मतांसह सर्व सात जागा जिंकणाऱ्या भाजपच्या पथ्यावर पडली होती. विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये ५४ टक्के मतांसह ७० पैकी अनुक्रमे ६७ आणि ६२ जागा जिंकणाऱ्या ‘आप’ला अद्याप लोकसभा निवडणुकीत खाते उघडता आलेले नाही. 

सातत्याने नाकारले; पण...दिल्लीत भाजपची किमान ३० ते ३२ टक्के मते पक्की असतात. विधानसभेत १९९३ साली एकदाच सत्तेत आलेल्या भाजपला दिल्लीकरांनी १९९८ पासून सातत्याने नाकारले आहे. मात्र, २०१४ पासून लोकसभेच्या सर्व सातही जागांसाठी भाजप दिल्लीकरांची पहिली पसंत ठरला आहे. दुसरीकडे केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली यांनी २०१३ साली दिल्ली विधानसभेची काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आणि २०२२ साली दिल्ली महापालिकेत १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपलाही पराभवाचा दणका दिला.  

नेतृत्वहीन काँग्रेसच्या मतांची बेरीज निर्णायकदोन वर्षांपूर्वी, दिल्ली पालिकेच्या २५० जागांसाठीच्या निवडणुकीत आपने ४२.०५ टक्के मतांसह १३४ जागांवर विजय मिळवित सत्ता संपादन केली. त्यावेळी भाजपने ३९.०९ टक्के मतांसह १०४ जागा तर काँग्रेसने ११.६८ टक्के मतांसह ९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतील ‘आप’-काँग्रेसच्या मतांची बेरीज भाजपपेक्षा जास्त भरली आहे.मतांचा हा टेंड्र कायम राहिला तर ‘आप’-काँग्रेस आघाडीला भाजपवर बाजी उलटविता येईल. पण त्यासाठी नेतृत्वहीन काँग्रेसच्या मतांची बेरीज निर्णायक ठरणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा