शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
IND vs SA 2nd Test : पंतनही गमावला टॉस! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
3
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
4
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
5
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
6
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
7
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
8
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
9
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
10
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
11
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
12
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
13
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
14
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
15
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
16
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
17
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
18
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
19
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:38 IST

Operation Sindoor: भारताच्या संरक्षण दलांकडून यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री प्रथमच आमने सामने येणार आहेत.

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताने सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तसेच या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारताच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानच्या हवाई तळांवर जबरदस्त हल्ला करत पाकिस्तानला युद्धविरामासाठी विनवणी करण्यास भाग पाडले होते. दरम्यान, भारताच्या संरक्षण दलांकडून यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री प्रथमच आमने सामने येणार आहेत.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आजपासून सुरू होत असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या दोन दिवसीय संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी चीनमधील किंगदाओ येथे दाखल झाले आहेत. तर तिथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ हेसुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानने परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. मात्र या संमेलनामद्ये राजनाथ सिंह आणि ख्वाजा आसिफ यांच्यामध्ये कुठलीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सर्व चर्चांना थांबवले आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने शांघाई परिषदेबाबत दिलेल्या आपल्या अधिकृत वक्तव्यामध्ये म्हटले आहे की, राजनाथ सिंह हे एससीओची तत्त्वे आणि उद्देशांबाबत भारताची कटिबद्धता अधोरेखित करतील.  ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचा दृष्टीकोन समोर ठेवतील. तसेच या भागामधील दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी संयुक्त आणि निरंतन प्रयत्नांसाठी आवाहन करतील. त्याशिवाय ते एससीओअंतर्गत व्यापार, आर्थिक सहकार्य आणि कनेक्टिव्हिटीला वाढवण्यावरही भर देतील. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानRajnath Singhराजनाथ सिंह