शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

'नवीन सरकार स्थापन होताच देशातील तेलबिया उत्पादकांचे प्रश्न सोडवणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 19:54 IST

परिषदेच्या अध्यक्षस्थानी अतुल चतुर्वेदी तर प्रमुख पाहुणे म्हणून गोदरेज कंपनीचे प्रमुख एन बी गोदरेज, केंद्र सरकारचे माजी कृषी सचिव सिराज हुसेन, आयुक्त डॉ.एस. के. मल्होत्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयपुर : आगामी काही दिवसांत देशात नवीन सरकार स्थापन होणार आहे. देशात उत्पादित होणाऱ्या तेलबियांच्या प्रश्नांत लक्ष घालून हे प्रश्न सोडवून घेऊ. या सरकारकडून शेतकरी आणि शेती संबंधातील प्रश्न सोडवून घेण्याची जबाबदारी माझी आहे, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिले. द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राजस्थानातील जयपूर येथे आयोजित मोहरी परिषदेत पाशा पटेल बोलत होते. 

परिषदेच्या अध्यक्षस्थानी अतुल चतुर्वेदी तर प्रमुख पाहुणे म्हणून गोदरेज कंपनीचे प्रमुख एन बी गोदरेज, केंद्र सरकारचे माजी कृषी सचिव सिराज हुसेन, आयुक्त डॉ.एस. के. मल्होत्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना पाशा पटेल म्हणाले की, आपण ७० टक्के खाद्य तेल आयात करतो. राजस्थानात मोहरी हे मुख्य पीक आहे. या पिकासाठी ४२०० रुपये हमीभाव निश्चित करण्यात आलेला असला तरी बाजारपेठेत शेतकऱ्यांना ३२०० रुपये दर मिळतो. एक क्विंटल सोयाबीनमध्ये १८ किलो तेल मिळते. मोहरीमध्ये हेच प्रमाण ४० किलो आहे. सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण कमी असतानाही योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. सोयाबीन तेलावरील आयात शुल्क वाढवले. सोयाबीन पेंड निर्यात करण्यासाठी दहा टक्के अनुदान दिले. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनला ३७०० ते ३८०० रुपये भाव मिळाला. तो हमीभावापेक्षा ३०० ते ४०० रुपये अधिक आहे. राजस्थानात असा प्रयत्न झाला असता तर हमीभावा एवढाच दर मोहरीलाही मिळाला असता. परदेशातून आयात होणाऱ्या मोहरीच्या तेलावर आयात शुल्क लावण्याची गरज आहे. मोहरीची पेंड निर्यात करण्यासाठी अनुदान मिळाले पाहिजे. हे झाले तर भावांतर योजनेत मोहरी खरेदी करण्याची वेळ येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पाशा पटेल यांनी सांगितले की, आपल्या देशात मोहरीचे ८५ लाख टन उत्पादन होते. सोयाबीनचे उत्पादन १०० लाख टन  तर कापसाचे उत्पादन १२५ लाख टन एवढे होते. सोयाबीन पेक्षा कापसाचे उत्पादन अधिक तर मोहरीचे उत्पादन कमी आहे. या सर्व पिकांना समान न्याय मिळाला तरच देशातील शेतकऱ्यांचे भले होणार आहे. भावांतरासाठी सरकारला खर्च करावा लागणार नाही, असेही ते म्हणाले. शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या हातात केवळ बारा वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापुढे ते प्रश्न सोडवणे कोणाच्याही हातात राहणार नाही. त्यामुळे गोदरेज व अदानी यासारख्या मोठ्या कंपन्यांनी पर्यावरण रक्षणासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेती वाचवायची असेल तर पर्यावरण रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे असेही पाशा पटेल म्हणाले.दरम्यान, उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या परिषदेस विजय दाता, डॉ.बी.व्ही. मेहता, मुंबईचे संदीप बजोरिया यांच्यासह देशातील नामांकित उद्योगपती, नियोजन मंडळ व उद्योगाशी संबंधित मान्यवर, राजस्थानातील विविध भागातील शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलFarmerशेतकरीjaipur-pcजयपूर