शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
3
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
5
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
6
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
7
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
8
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
9
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
10
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
11
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
12
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
13
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
14
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
15
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
16
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
17
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
18
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
19
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
20
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:15 IST

Smriti Irani VS Priyanka Gandhi : स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून केएल शर्मा यांच्याकडून पराभूत झाल्या.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेली मतदारसंघातून आपली खासदारकी कायम ठेवणार आहेत. तर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गांधी परिवारातील आणखी एक सदस्य दक्षिणेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

गांधी घराण्याचे दक्षिणेशी जुने नाते आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणूक जिंकली होती. यानंतर १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडक मतदारसंघातून विजय मिळवला होता. १९९९ मध्ये सोनिया गांधींनीही दक्षिणेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर त्यांनी बेल्लारीची जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आता प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागेवरून भाजप कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात रंगली आहे. वायनाडमधून भाजप नेत्या स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकते, अशीही सुरु चर्चा आहे. दरम्यान, स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून केएल शर्मा यांच्याकडून पराभूत झाल्या. मात्र २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजप त्यांना वायनाड जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधींविरोधात लढवली होती निवडणूक यापूर्वीही भाजपने उमेदवारी तिकिटांबाबत आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. सोनिया गांधींना १९९९ मध्ये बेल्लारीतून काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतर भाजपने याच जागेवरून सुषमा स्वराज यांना तिकीट देऊन निवडणूक चुरशीची बनवली होती. या जागेवर सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना कडवी टक्कर दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सोनिया गांधींना ४१४००० मते मिळाली होती. तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास ५६००० मतांनी जिंकता आली.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीwayanad-pcवायनाडcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधी