शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:15 IST

Smriti Irani VS Priyanka Gandhi : स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून केएल शर्मा यांच्याकडून पराभूत झाल्या.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेली मतदारसंघातून आपली खासदारकी कायम ठेवणार आहेत. तर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गांधी परिवारातील आणखी एक सदस्य दक्षिणेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

गांधी घराण्याचे दक्षिणेशी जुने नाते आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणूक जिंकली होती. यानंतर १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडक मतदारसंघातून विजय मिळवला होता. १९९९ मध्ये सोनिया गांधींनीही दक्षिणेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर त्यांनी बेल्लारीची जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आता प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागेवरून भाजप कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात रंगली आहे. वायनाडमधून भाजप नेत्या स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकते, अशीही सुरु चर्चा आहे. दरम्यान, स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून केएल शर्मा यांच्याकडून पराभूत झाल्या. मात्र २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजप त्यांना वायनाड जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधींविरोधात लढवली होती निवडणूक यापूर्वीही भाजपने उमेदवारी तिकिटांबाबत आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. सोनिया गांधींना १९९९ मध्ये बेल्लारीतून काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतर भाजपने याच जागेवरून सुषमा स्वराज यांना तिकीट देऊन निवडणूक चुरशीची बनवली होती. या जागेवर सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना कडवी टक्कर दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सोनिया गांधींना ४१४००० मते मिळाली होती. तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास ५६००० मतांनी जिंकता आली.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीwayanad-pcवायनाडcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधी