शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

मरांडी यांच्यापाठोपाठ शत्रुघ्न सिन्हांची होणार भाजपमध्ये घरवापसी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 10:25 IST

नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून अमित शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता.

नवी दिल्ली - झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी आपला झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम)  पक्ष भाजपमध्ये विलीन केला. केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या खेळीमुळेच हे शक्य झाले असून त्यांच्या या कृतीचे काँग्रेसनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कौतुक केले आहे. तसेच मरांडी यांच्या घरवापसीमुळे 14 वर्षांचा वनवास समाप्त झाल्याचे उद्गार सिन्हा यांनी काढले. त्यामुळे आता शत्रुघ्न सिन्हा देखील भाजपमध्ये घरवापसीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सिन्हा यांनी ट्विट करून अमित शाह यांचे कौतुक केले. तसेच शाह यांना मास्ट्रर स्ट्रॅटर्जिस्ट संबोधले आहे. जबरदस्त व्यक्तमत्व, इमानदार, विश्वासू आणि नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता.

बिहारमधील निवडणुकीशी कनेक्शनभाजपमध्ये बंडखोरी केल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रसमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपच्या बाबतीत सिन्हा कायमच सॉफ्ट दिसून आले. त्यामुळे बाबुलाल मरांडी यांच्यानंतर सिन्हाही घरवापसी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. काँग्रेसमध्ये गेल्यापासून सिन्हा राजकारणापासून दुरावले आहेत. त्यातच या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक आहे. अशा स्थितीत सिन्हा यांची भाजपमध्ये वापसी करणे शक्य असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.