शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून उभे राहणार?, दक्षिणेत काँग्रेसला बळकटी आणण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 5:41 AM

वायनाडमधून लोकसभा लढविल्यास केरळबरोबरच तामिळनाडू व कर्नाटकातही काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज काँग्रेसच्या धुरिणांकडून वर्तविला जात आहे.

- पोपट पवारतिरूवनंतपुरम : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही निवडणुकीच्या मैदानात उतरावे, या मागणीला जोर धरत असून, राहुल यांनी वायनाडची निवड केल्यास काँग्रेसचा दक्षिणेत प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. वायनाडमधून लोकसभा लढविल्यास केरळबरोबरच तामिळनाडू व कर्नाटकातही काँग्रेसला फायदा होईल असा अंदाज काँग्रेसच्या धुरिणांकडून वर्तविला जात आहे. यासाठीच राहुल यांना दक्षिणेच्या मैदानावर आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.राहुल गांधी यांनी याबाबत अद्यापही कोणताच निर्णय घेतलेला नाही. नरेंद्र मोदी यांनी २0१४ साली वाराणसी व वडोदरामधून निवडणूक लढविली होती. भाजपासाठी हा निर्णय फायद्याचा ठरला होता. त्यामुळे केरळ काँग्रेसने राहुल यांना गळ घातली आहे. वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कोळीकोड (कालिकत), वायनाड आणि मलप्पूरम या तीन जिल्ह्यांतील सात विधानसभा मतदारसंघ त्यात येतात.येथील ९३.१५ टक्के जनता ग्रामीण, तर ६.८५ टक्के जनता शहरी आहे. पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. काँग्रेसच्या एम. आय. शनवास २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा जिंकली आहे.गांधी कुटुंबीयांचा दक्षिणेवर विश्वासगांधी घराण्याने याआधी कर्नाटकातील बेल्लारी, चिकमंगलूर आणि आंध्रमधील मेडक मतदारसंघांतून दिल्ली गाठली आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये चिकमंगलूर, तर सोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये बेल्लारी येथून निवडणूक लढविली होती. राहुल यांनी वायनाड मतदारसंघाची निवड केली तरी दक्षिणेतील स्वारी त्यांच्यासाठी नवी नसेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक