शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

रुग्ण वाढणार की स्थिती नियंत्रणात येणार?; कोरोनाबाबत सर्वांचे दावे वेगवेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 22:54 IST

जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकाबाबत सर्वांचे दावे चुकीचे ठरले आहेत. कारण काहीही असले तरी तज्ज्ञांच्या दाव्यांनी सरकार व जनतेची दिशाभूल केली. कोरोना कसा वाढेल, त्याची वाटचाल कशी असेल, याबाबत कोणालाच माहिती नाही. १७ जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या पलीकडे जाईल, असे कोणीही म्हटले नव्हते. जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

कोरोना उद्रेकाच्या उच्चांकाबाबत कोण काय म्हणाले?

नॅशनल टास्क फोर्सचे अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणतात की, देशातील काहीच भागांमध्ये विशेषत: दाट लोकसंख्येच्या भागात स्थिती वाईट आहे. अनेक भाग संक्रमित नाहीत. संपूर्ण देश प्रभावित झाला, असे म्हणता येणार नाही.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात की, चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ होईल. आॅगस्टपर्यंत हा वेग कमीही होईल. कदाचित दुसऱ्या टप्प्याचाही सामना करावा लागू शकतो.

आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता म्हणतात की, भारतात अद्याप कोरोनाचा उच्चांक नाही. कोरोना संक्रमण लोकल ट्रान्सफर स्टेजमध्ये आहे.

१) ११ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन व कंटेन्मेंट केले नाही तर रुग्णांची संख्या १५ एप्रिल रोजी ८ लाख २० हजार झाली असती. देशात केवळ कंटेन्मेंट केले तर १५ एप्रिलपर्यंत १.२० लाख रुग्ण झाले असते. देशात या दिवसापर्यंत ७५२८ रुग्ण होते. ६४३ बरे झाले व २४२ मृत्यू झाले. (दावा चुकीचा)

२) राष्ट्रीय टास्क फोर्स आणि ग्रुप ऑफ इम्पॉवरमेंटचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी २२ मे रोजी म्हटले होते की, देशात ३७ हजार ते ७८ हजार मृत्यू होऊ शकले असते. घराची लक्ष्मण रेषा आम्ही पार केली नाही म्हणून हे टळले. त्यावेळी देशातील रुग्णांची संख्या १,१८,४४७ होती. त्यातील ६६,३३० सक्रिय रुग्ण होते व ४८,५३४ बरे झाले होते. त्यावेळी ३,५८३ मरण पावले होते. तथापि, त्यांना खुलासा द्यावा लागला होता. (दावा चुकीचा)

आयआयटी मुंबई व सिंगापूर विद्यापीठ म्हणते कोरोना संपेल

1 आयआयटी मुंबईने १३ जुलै रोजी अध्ययनात म्हटले आहे की, २ आठवडे ते २.५ महिन्यांत देशातील राज्यांतून कोरोना संपेल. लस आल्याशिवाय हे शक्य नाही.

2 सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनने २८ एप्रिल रोजी म्हटले होते की, कोरोना जगातून ९ डिसेंबर २०२० पर्यंत जाईल. भारतातून तो २६ जुलैपर्यंत संपेल. हे सध्या तरी अशक्य आहे.

३) ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या मध्यात कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक असेल, असे आयसीएमआरने १४ जून रोजी म्हटले होते. नंतर म्हटले की, या अभ्यासाशी आमचा संबंध नाही. (दावा चुकीचा)

४) बंगळुरूतील आयआयएससीने १६ जुलै रोजी म्हटले होते की, स्थितीत सुधारणा झाली नाही तर मार्च २०२१ पर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३७.४ लाखांपर्यंत जाऊ शकते. स्थिती खूपच बिघडली तर ६.१८ कोटी संक्रमित होऊ शकतात.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या