शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

रुग्ण वाढणार की स्थिती नियंत्रणात येणार?; कोरोनाबाबत सर्वांचे दावे वेगवेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 22:54 IST

जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकाबाबत सर्वांचे दावे चुकीचे ठरले आहेत. कारण काहीही असले तरी तज्ज्ञांच्या दाव्यांनी सरकार व जनतेची दिशाभूल केली. कोरोना कसा वाढेल, त्याची वाटचाल कशी असेल, याबाबत कोणालाच माहिती नाही. १७ जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या पलीकडे जाईल, असे कोणीही म्हटले नव्हते. जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

कोरोना उद्रेकाच्या उच्चांकाबाबत कोण काय म्हणाले?

नॅशनल टास्क फोर्सचे अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणतात की, देशातील काहीच भागांमध्ये विशेषत: दाट लोकसंख्येच्या भागात स्थिती वाईट आहे. अनेक भाग संक्रमित नाहीत. संपूर्ण देश प्रभावित झाला, असे म्हणता येणार नाही.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात की, चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ होईल. आॅगस्टपर्यंत हा वेग कमीही होईल. कदाचित दुसऱ्या टप्प्याचाही सामना करावा लागू शकतो.

आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता म्हणतात की, भारतात अद्याप कोरोनाचा उच्चांक नाही. कोरोना संक्रमण लोकल ट्रान्सफर स्टेजमध्ये आहे.

१) ११ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन व कंटेन्मेंट केले नाही तर रुग्णांची संख्या १५ एप्रिल रोजी ८ लाख २० हजार झाली असती. देशात केवळ कंटेन्मेंट केले तर १५ एप्रिलपर्यंत १.२० लाख रुग्ण झाले असते. देशात या दिवसापर्यंत ७५२८ रुग्ण होते. ६४३ बरे झाले व २४२ मृत्यू झाले. (दावा चुकीचा)

२) राष्ट्रीय टास्क फोर्स आणि ग्रुप ऑफ इम्पॉवरमेंटचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी २२ मे रोजी म्हटले होते की, देशात ३७ हजार ते ७८ हजार मृत्यू होऊ शकले असते. घराची लक्ष्मण रेषा आम्ही पार केली नाही म्हणून हे टळले. त्यावेळी देशातील रुग्णांची संख्या १,१८,४४७ होती. त्यातील ६६,३३० सक्रिय रुग्ण होते व ४८,५३४ बरे झाले होते. त्यावेळी ३,५८३ मरण पावले होते. तथापि, त्यांना खुलासा द्यावा लागला होता. (दावा चुकीचा)

आयआयटी मुंबई व सिंगापूर विद्यापीठ म्हणते कोरोना संपेल

1 आयआयटी मुंबईने १३ जुलै रोजी अध्ययनात म्हटले आहे की, २ आठवडे ते २.५ महिन्यांत देशातील राज्यांतून कोरोना संपेल. लस आल्याशिवाय हे शक्य नाही.

2 सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनने २८ एप्रिल रोजी म्हटले होते की, कोरोना जगातून ९ डिसेंबर २०२० पर्यंत जाईल. भारतातून तो २६ जुलैपर्यंत संपेल. हे सध्या तरी अशक्य आहे.

३) ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या मध्यात कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक असेल, असे आयसीएमआरने १४ जून रोजी म्हटले होते. नंतर म्हटले की, या अभ्यासाशी आमचा संबंध नाही. (दावा चुकीचा)

४) बंगळुरूतील आयआयएससीने १६ जुलै रोजी म्हटले होते की, स्थितीत सुधारणा झाली नाही तर मार्च २०२१ पर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३७.४ लाखांपर्यंत जाऊ शकते. स्थिती खूपच बिघडली तर ६.१८ कोटी संक्रमित होऊ शकतात.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या