शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण वाढणार की स्थिती नियंत्रणात येणार?; कोरोनाबाबत सर्वांचे दावे वेगवेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 22:54 IST

जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकाबाबत सर्वांचे दावे चुकीचे ठरले आहेत. कारण काहीही असले तरी तज्ज्ञांच्या दाव्यांनी सरकार व जनतेची दिशाभूल केली. कोरोना कसा वाढेल, त्याची वाटचाल कशी असेल, याबाबत कोणालाच माहिती नाही. १७ जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या पलीकडे जाईल, असे कोणीही म्हटले नव्हते. जुलैमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल किंवा त्याचा उच्चांक होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते. त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.

कोरोना उद्रेकाच्या उच्चांकाबाबत कोण काय म्हणाले?

नॅशनल टास्क फोर्सचे अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणतात की, देशातील काहीच भागांमध्ये विशेषत: दाट लोकसंख्येच्या भागात स्थिती वाईट आहे. अनेक भाग संक्रमित नाहीत. संपूर्ण देश प्रभावित झाला, असे म्हणता येणार नाही.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात की, चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ होईल. आॅगस्टपर्यंत हा वेग कमीही होईल. कदाचित दुसऱ्या टप्प्याचाही सामना करावा लागू शकतो.

आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता म्हणतात की, भारतात अद्याप कोरोनाचा उच्चांक नाही. कोरोना संक्रमण लोकल ट्रान्सफर स्टेजमध्ये आहे.

१) ११ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन व कंटेन्मेंट केले नाही तर रुग्णांची संख्या १५ एप्रिल रोजी ८ लाख २० हजार झाली असती. देशात केवळ कंटेन्मेंट केले तर १५ एप्रिलपर्यंत १.२० लाख रुग्ण झाले असते. देशात या दिवसापर्यंत ७५२८ रुग्ण होते. ६४३ बरे झाले व २४२ मृत्यू झाले. (दावा चुकीचा)

२) राष्ट्रीय टास्क फोर्स आणि ग्रुप ऑफ इम्पॉवरमेंटचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी २२ मे रोजी म्हटले होते की, देशात ३७ हजार ते ७८ हजार मृत्यू होऊ शकले असते. घराची लक्ष्मण रेषा आम्ही पार केली नाही म्हणून हे टळले. त्यावेळी देशातील रुग्णांची संख्या १,१८,४४७ होती. त्यातील ६६,३३० सक्रिय रुग्ण होते व ४८,५३४ बरे झाले होते. त्यावेळी ३,५८३ मरण पावले होते. तथापि, त्यांना खुलासा द्यावा लागला होता. (दावा चुकीचा)

आयआयटी मुंबई व सिंगापूर विद्यापीठ म्हणते कोरोना संपेल

1 आयआयटी मुंबईने १३ जुलै रोजी अध्ययनात म्हटले आहे की, २ आठवडे ते २.५ महिन्यांत देशातील राज्यांतून कोरोना संपेल. लस आल्याशिवाय हे शक्य नाही.

2 सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनने २८ एप्रिल रोजी म्हटले होते की, कोरोना जगातून ९ डिसेंबर २०२० पर्यंत जाईल. भारतातून तो २६ जुलैपर्यंत संपेल. हे सध्या तरी अशक्य आहे.

३) ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या मध्यात कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक असेल, असे आयसीएमआरने १४ जून रोजी म्हटले होते. नंतर म्हटले की, या अभ्यासाशी आमचा संबंध नाही. (दावा चुकीचा)

४) बंगळुरूतील आयआयएससीने १६ जुलै रोजी म्हटले होते की, स्थितीत सुधारणा झाली नाही तर मार्च २०२१ पर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३७.४ लाखांपर्यंत जाऊ शकते. स्थिती खूपच बिघडली तर ६.१८ कोटी संक्रमित होऊ शकतात.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या