शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कर्नाटकच्या राजकीय नाट्यामध्ये नवा ट्विस्ट, जेडीएस देणार भाजपाला पाठिंबा?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 08:48 IST

कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता  कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही.

बंगळुरू  - कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता  कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही. आता कर्नाटकमधील राजकीय नाट्यात नवा ट्विस्ट आला असून, सत्तेतून बाहेर झालेल्या जेडीएसच्या आमदारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्यात यावा, असी मागणी केली आहे.  जेडीएसच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना सांगितले की, येडियुरप्पा यांच्या सरकारला सरकारमध्ये सहभागी होऊन किंवा बाहेरून पाठिंबा देऊन समर्थन देता येऊ शकेल. मात्र या आमदारांनी अंतिम निर्णय कुमारस्वामी यांच्यावर सोडला आहे. तसेच ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगितले आहे.  जेडीएसच्या आमदारांची शुक्रवारी बैठक झाली होती. त्यावेळी आमदारांच्या एका गटाने आपण विरोधी पक्षात बसावे आणि भाजपाच्या चांगल्या धोरणांचे स्वागत करावे असे सुचवले. मात्र चर्चेअंती सर्व आमदारांनी भाजपाला पाठिंबा देणे आणि सरकार वाचवणेच योग्य ठरेल, असे मत आमदारांनी व्यक्त केले. जेडीएसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत आम्ही पक्षासोबत एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत काही आमदारांनी सरकारला पाठिंबा द्यावा, असे मत मांडले. तर काही जणांनी विरोधी पक्षात बसावे, असे सुचवले, अशी माहिती जेडीएसचे नेते जी.टी. देवेगौडा यांनी दिली.   

दरम्यान, भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना शपथ दिली. येडियुरप्पा यांना सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आपण सहज बहुमत सिद्ध करू, असा दावा त्यांनी केला.येडियुरप्पा यांनी १0५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना शुक्रवारी सकाळी सत्तास्थापनेचा दावा करताना सांगितले. मात्र ही संख्या बहुमतासाठी पुरेशी नाही. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी किती आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, हे स्पष्ट होईल. काही आमदारांनी याआधी विधानसभाध्यक्षांना राजीनामे दिले आहेत. त्यांच्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच तीन आमदारांना विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी गुरुवारीच अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सोमवारी किती जण मतदान करतात व किती जणांना मतदानाचा अधिकार असेल, हे २ दिवसांत स्पष्ट होईल. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)BJPभाजपाkumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पा