शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

विराेधकांना एकत्र आणणार का? नितीशकुमारांसमोर आव्हान; शिवसेना, राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांशी चर्चा करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:59 IST

नितीशकुमार हे दिल्लीत आयएनएलडीचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, जद एसचे नेते एच. डी. कुमारस्वामी आदी नेत्यांची भेट घेणार आहेत. 

शरद गुप्ता -

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले असून, विरोधी पक्षांना एकत्र करण्यासोबतच कधी केंद्रात सत्तेत राहिलेल्या जनता दलाच्या सर्व घटक पक्षांना एकाच व्यासपीठावर आणणे ही त्यांची प्राथमिकता आहे. 

नितीशकुमार यांचे म्हणणे आहे की, जनता दल यू, जनता दल एस, राष्ट्रीय जनता दल, इंडियन नॅशनल लोकदल, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल आणि बिजू जनता दल यासारख्या जनता दलाच्या सर्व घटकांनी सोबत आल्याने जे व्यासपीठ तयार होईल, ते भाजपाला आव्हान देण्यासाठी दुसरी किंवा तिसरी नव्हे, तर पहिली आघाडी ठरेल. हे सर्व पक्ष आपसात विलिनिकरण करून एका मोठ्या पक्षाचे स्वरुप घेऊ शकतात. यातील बहुतांश पक्ष आपापल्या राज्यात एकतर सत्तारुढ किंवा मुख्य विरोधी पक्ष आहेत. देशात विधानसभांमधील एकूण ४२२५ सदस्यांपैकी भाजपाकडे केवळ १३८८ आमदार आहेत. तर, जनता दलाचे कधी घटक राहिलेल्या पक्षांकडे ४२२ सदस्य आहेत. तर, काँग्रेसकडे ६८९ सदस्य आहेत. आगामी दोन वर्षांत होणाऱ्या गुजरात, हिमाचल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता नाही.

नितीशकुमार हे दिल्लीत आयएनएलडीचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, जद एसचे नेते एच. डी. कुमारस्वामी आदी नेत्यांची भेट घेणार आहेत. 

दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. ते बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. नितीशकुमार हे दिल्लीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ शकतात. 

काँग्रेसशिवाय विरोधकांची एकी अशक्य नितीशकुमार यांचे स्पष्ट मत आहे की, काँग्रेसला बाहेर ठेवून भाजपाविरुद्ध कोणतीही आघाडी यशस्वी होणार नाही. नितीशकुमार हे बिहारमध्ये काँग्रेससोबत सरकारमध्ये आहेत.

भाजपला ५० जागांवर रोखणार -- २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ५० जागांवर रोखण्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे स्वप्न आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह व मंत्री अशोक चौधरी हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी नितीशकुमार यांची चर्चा होऊ शकणार नाही. - पत्रकारांनी नितीशकुमार यांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, ५० जागांवर रोखण्याबाबत आपण बोललोच नाही. तर, जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी असे आवाहन केले होते की, भाजपाला ५० जागांवर रोखायचे आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस