शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

विराेधकांना एकत्र आणणार का? नितीशकुमारांसमोर आव्हान; शिवसेना, राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांशी चर्चा करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:59 IST

नितीशकुमार हे दिल्लीत आयएनएलडीचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, जद एसचे नेते एच. डी. कुमारस्वामी आदी नेत्यांची भेट घेणार आहेत. 

शरद गुप्ता -

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले असून, विरोधी पक्षांना एकत्र करण्यासोबतच कधी केंद्रात सत्तेत राहिलेल्या जनता दलाच्या सर्व घटक पक्षांना एकाच व्यासपीठावर आणणे ही त्यांची प्राथमिकता आहे. 

नितीशकुमार यांचे म्हणणे आहे की, जनता दल यू, जनता दल एस, राष्ट्रीय जनता दल, इंडियन नॅशनल लोकदल, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल आणि बिजू जनता दल यासारख्या जनता दलाच्या सर्व घटकांनी सोबत आल्याने जे व्यासपीठ तयार होईल, ते भाजपाला आव्हान देण्यासाठी दुसरी किंवा तिसरी नव्हे, तर पहिली आघाडी ठरेल. हे सर्व पक्ष आपसात विलिनिकरण करून एका मोठ्या पक्षाचे स्वरुप घेऊ शकतात. यातील बहुतांश पक्ष आपापल्या राज्यात एकतर सत्तारुढ किंवा मुख्य विरोधी पक्ष आहेत. देशात विधानसभांमधील एकूण ४२२५ सदस्यांपैकी भाजपाकडे केवळ १३८८ आमदार आहेत. तर, जनता दलाचे कधी घटक राहिलेल्या पक्षांकडे ४२२ सदस्य आहेत. तर, काँग्रेसकडे ६८९ सदस्य आहेत. आगामी दोन वर्षांत होणाऱ्या गुजरात, हिमाचल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता नाही.

नितीशकुमार हे दिल्लीत आयएनएलडीचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, जद एसचे नेते एच. डी. कुमारस्वामी आदी नेत्यांची भेट घेणार आहेत. 

दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. ते बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. नितीशकुमार हे दिल्लीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ शकतात. 

काँग्रेसशिवाय विरोधकांची एकी अशक्य नितीशकुमार यांचे स्पष्ट मत आहे की, काँग्रेसला बाहेर ठेवून भाजपाविरुद्ध कोणतीही आघाडी यशस्वी होणार नाही. नितीशकुमार हे बिहारमध्ये काँग्रेससोबत सरकारमध्ये आहेत.

भाजपला ५० जागांवर रोखणार -- २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ५० जागांवर रोखण्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे स्वप्न आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह व मंत्री अशोक चौधरी हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी नितीशकुमार यांची चर्चा होऊ शकणार नाही. - पत्रकारांनी नितीशकुमार यांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, ५० जागांवर रोखण्याबाबत आपण बोललोच नाही. तर, जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी असे आवाहन केले होते की, भाजपाला ५० जागांवर रोखायचे आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस