शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नव्या १० टक्के आरक्षणचा विषय देणार घटनापीठाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:50 IST

१०३ व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी घटनापीठाकडे घ्यायची की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय येत्या २८ मार्च रोजी विचार करणार आहे. 

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील व्यक्तींना सरकारी नोकऱ्या व शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या १०३ व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी घटनापीठाकडे घ्यायची की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय येत्या २८ मार्च रोजी विचार करणार आहे. यासंबंधीच्या याचिका सोमवारी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे आल्या तेव्हा सरन्यायाधीशांनी हे संकेत दिले.एका याचिकाकर्त्याचे ज्येष्ठ वकील डॉ. राजीव धवन यांनी हे प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले की, या नव्या कायद्याने एकूण कायद्याची ५० टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडली आहे. जास्तीत जास्त ५० टक्के आरक्षण हे राज्यघटनेच्या मुलभूत तत्त्वांपैकी एक असल्याने ही घटनादुरुस्ती तद्दन घटनाबाह्य असल्याचे आमचे म्हणणे आहे. याआधी असे अनेक निकाल झाले आहेत.डॉ. धवन यांचे म्हणणे ऐकल्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही सुनावणीसाठी लवकरात लवकरची २८ मार्च ही तारीख दिली आहे. त्यावेळी प्रकरण अधिक मोठया पीठाकडे पाठविणे गरजेचे वाटले तर आम्ही त्याचाही विचार करू, मात्र तोपर्यंत आम्ही या दुरुस्तीला अंतरिम स्थगिती काही देणार नाही.

टॅग्स :reservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय