शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार; मायावती यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 13:55 IST

एनडीए आणि इंडिया यांची देशातील सर्व पक्षांसोबत जुळवाजुळव सुरु असताना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठोस आव्हान देण्याच्या प्रयत्नात २६ विरोधी पक्षांनी मंगळवारी त्यांच्या आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस’ (इंडिया) असे ठेवले. देशासमोर पर्यायी राजकीय, सामाजिक व आर्थिक अजेंडा मांडण्याचा संकल्प विरोधकांची बैठकीत व्यक्त केला. दोन दिवसीय बैठकीत विरोधी पक्षांनी युतीमध्ये एक समन्वयक आणि ११ सदस्यांची समन्वय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. 

एनडीए आणि इंडिया यांची देशातील सर्व पक्षांसोबत जुळवाजुळव सुरु असताना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय मायावती यांनी घेतला आहे. मायावती यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, विरोधी पक्ष सत्ता मिळविण्यासाठी युती करत आहेत. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेस आपल्यासारख्या जातीयवादी आणि भांडवलशाही शक्तींशी युती करत आहे. काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडल्यावरच दलित, मागासलेल्या, गरीबांची आठवण येते. सत्तेत असताना भाजपा आणि काँग्रेसला कोणाचीही पर्वा नाही. २०१४मध्ये भाजपाने प्रत्येक गरीबाच्या खात्यात १५-१५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले नाही, अशी टीका मायावती यांनी केली.

राहुल गांधी यांनी सुचवले ‘इंडिया’ नाव 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवावे, असे सुचवले. सर्वसंमतीने याला पाठिंबा देण्यात आला. सर्वप्रथम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींच्या सूचनेची प्रशंसा करताना म्हटले की, यापेक्षा अधिक चांगले नाव असूच शकत नाही. आघाडीचे नाव इंडिया असे सुचवताना राहुल गांधी बैठकीत म्हणाले की, ही आघाडी देशासोबत आहे. आपली लढाई कुणासाठी आहे? आक्रमण कोणावर होत आहे? हल्ला कोणावर होत आहे? देशाचे संविधान, लोक, संस्था, स्वातंत्र्य व लोकशाहीवर हल्ला होत आहे. ही लढाई ‘इंडिया’ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे.

विरोधकांची पुढील बैठक होणार मुंबईत

विरोधी आघाडीचा चेहरा कोण असेल, यासंदर्भात पत्रपरिषदेत मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत आघाडीचे निमंत्रक आणि समन्वय समितीचे सदस्य निश्चित केले जातील. सर्व नेते आणि समन्वय समितीच्या सदस्यांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जाईल. विरोधी ऐक्यासंदर्भात होणारी तिसरी बैठक मुंबईत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली नसली तरी ती संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर म्हणजे १५ ऑगस्टनंतर होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :mayawatiमायावतीElectionनिवडणूक