शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार; मायावती यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 13:55 IST

एनडीए आणि इंडिया यांची देशातील सर्व पक्षांसोबत जुळवाजुळव सुरु असताना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठोस आव्हान देण्याच्या प्रयत्नात २६ विरोधी पक्षांनी मंगळवारी त्यांच्या आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस’ (इंडिया) असे ठेवले. देशासमोर पर्यायी राजकीय, सामाजिक व आर्थिक अजेंडा मांडण्याचा संकल्प विरोधकांची बैठकीत व्यक्त केला. दोन दिवसीय बैठकीत विरोधी पक्षांनी युतीमध्ये एक समन्वयक आणि ११ सदस्यांची समन्वय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. 

एनडीए आणि इंडिया यांची देशातील सर्व पक्षांसोबत जुळवाजुळव सुरु असताना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय मायावती यांनी घेतला आहे. मायावती यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, विरोधी पक्ष सत्ता मिळविण्यासाठी युती करत आहेत. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेस आपल्यासारख्या जातीयवादी आणि भांडवलशाही शक्तींशी युती करत आहे. काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडल्यावरच दलित, मागासलेल्या, गरीबांची आठवण येते. सत्तेत असताना भाजपा आणि काँग्रेसला कोणाचीही पर्वा नाही. २०१४मध्ये भाजपाने प्रत्येक गरीबाच्या खात्यात १५-१५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले नाही, अशी टीका मायावती यांनी केली.

राहुल गांधी यांनी सुचवले ‘इंडिया’ नाव 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवावे, असे सुचवले. सर्वसंमतीने याला पाठिंबा देण्यात आला. सर्वप्रथम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींच्या सूचनेची प्रशंसा करताना म्हटले की, यापेक्षा अधिक चांगले नाव असूच शकत नाही. आघाडीचे नाव इंडिया असे सुचवताना राहुल गांधी बैठकीत म्हणाले की, ही आघाडी देशासोबत आहे. आपली लढाई कुणासाठी आहे? आक्रमण कोणावर होत आहे? हल्ला कोणावर होत आहे? देशाचे संविधान, लोक, संस्था, स्वातंत्र्य व लोकशाहीवर हल्ला होत आहे. ही लढाई ‘इंडिया’ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे.

विरोधकांची पुढील बैठक होणार मुंबईत

विरोधी आघाडीचा चेहरा कोण असेल, यासंदर्भात पत्रपरिषदेत मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत आघाडीचे निमंत्रक आणि समन्वय समितीचे सदस्य निश्चित केले जातील. सर्व नेते आणि समन्वय समितीच्या सदस्यांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जाईल. विरोधी ऐक्यासंदर्भात होणारी तिसरी बैठक मुंबईत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली नसली तरी ती संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर म्हणजे १५ ऑगस्टनंतर होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :mayawatiमायावतीElectionनिवडणूक