शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:35 IST

Lok Sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी कांग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक आणि राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस,  प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याच्या विधानसभांमधील काँग्रेच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे सूर काहीसे मवाळ झाले आहेत. काँग्रेसकडून  इंडिया आघाडीतील घटक पक्षांना झुकतं माप दिलं जात आहे. पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजकपद देण्यासही तयारी दर्शवली आहे. तसेच जागावाटपामध्ये केवळ २५५ जागांवर समाधान मानण्याची मानसिक तयारीही काँग्रेरसच्या नेत्यांनी केली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या ४२१ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये पक्षाला केवळ ५२ जागा जिंकता आल्या होत्या. आता २०१९ पेक्षा कमी जागा लढवण्यास तयार असलेल्या कांग्रेसने विविध राज्यांमधील स्थानिक पक्षांबाबत मवाळ भूमिका घेण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. दरम्यान, काँग्रेसकडून सध्या उचलण्यात येत असलेली पावले काँग्रेसच्या २००१ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या अधिवेशनात सोनिया गांधींनी आखलेल्या रणनीतीने  प्रभावित झालेली दिसत आहेत.

काँग्रेसच्या २००१ मधील अधिवेशनात सोनिया गांधींनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस १५ पक्षांच्या यूपीए या आघाडीसह  अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात मैदानात उतरेल, असे घोषित केले होते. मात्र २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ६ समविचारी  पक्षांसोबत आघाडी केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये टीआरएस, तामिळनाडूमध्ये डीएमके, झारखंडमध्ये जेएमएम आणि बिहारमध्ये आरजेडी-एलजेपीसोबत आघाडी केली होती. त्यावेळी या राज्यांमध्ये काँग्रेसला जबरदस्त फायदा झाला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये कुठल्याही पक्षासोबत आघाडी केली नव्हती. 

आघाडी केलेल्या पाच राज्यांमधील लोकसभेच्या १८८ जागांपैकी ११४  जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी ५६ जागांवर बाजी मारली होती. यावेळीही काँग्रेस २००४ ची रणनीती घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने रायपूरमध्ये झालेल्या आपल्या ८५ व्या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकभा निवडणुकीसाठी २००४ मधील रणनीती वापरण्याचे निश्चित केले होते. 

योगायोगाची बाब म्हणजे २००३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पराभवाचा सामना केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करताना पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. आता त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा