शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:35 IST

Lok Sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी कांग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक आणि राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस,  प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याच्या विधानसभांमधील काँग्रेच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे सूर काहीसे मवाळ झाले आहेत. काँग्रेसकडून  इंडिया आघाडीतील घटक पक्षांना झुकतं माप दिलं जात आहे. पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजकपद देण्यासही तयारी दर्शवली आहे. तसेच जागावाटपामध्ये केवळ २५५ जागांवर समाधान मानण्याची मानसिक तयारीही काँग्रेरसच्या नेत्यांनी केली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या ४२१ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये पक्षाला केवळ ५२ जागा जिंकता आल्या होत्या. आता २०१९ पेक्षा कमी जागा लढवण्यास तयार असलेल्या कांग्रेसने विविध राज्यांमधील स्थानिक पक्षांबाबत मवाळ भूमिका घेण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. दरम्यान, काँग्रेसकडून सध्या उचलण्यात येत असलेली पावले काँग्रेसच्या २००१ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या अधिवेशनात सोनिया गांधींनी आखलेल्या रणनीतीने  प्रभावित झालेली दिसत आहेत.

काँग्रेसच्या २००१ मधील अधिवेशनात सोनिया गांधींनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस १५ पक्षांच्या यूपीए या आघाडीसह  अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात मैदानात उतरेल, असे घोषित केले होते. मात्र २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ६ समविचारी  पक्षांसोबत आघाडी केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये टीआरएस, तामिळनाडूमध्ये डीएमके, झारखंडमध्ये जेएमएम आणि बिहारमध्ये आरजेडी-एलजेपीसोबत आघाडी केली होती. त्यावेळी या राज्यांमध्ये काँग्रेसला जबरदस्त फायदा झाला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये कुठल्याही पक्षासोबत आघाडी केली नव्हती. 

आघाडी केलेल्या पाच राज्यांमधील लोकसभेच्या १८८ जागांपैकी ११४  जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी ५६ जागांवर बाजी मारली होती. यावेळीही काँग्रेस २००४ ची रणनीती घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने रायपूरमध्ये झालेल्या आपल्या ८५ व्या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकभा निवडणुकीसाठी २००४ मधील रणनीती वापरण्याचे निश्चित केले होते. 

योगायोगाची बाब म्हणजे २००३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पराभवाचा सामना केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करताना पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. आता त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा