शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:35 IST

Lok Sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी कांग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक आणि राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस,  प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याच्या विधानसभांमधील काँग्रेच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे सूर काहीसे मवाळ झाले आहेत. काँग्रेसकडून  इंडिया आघाडीतील घटक पक्षांना झुकतं माप दिलं जात आहे. पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजकपद देण्यासही तयारी दर्शवली आहे. तसेच जागावाटपामध्ये केवळ २५५ जागांवर समाधान मानण्याची मानसिक तयारीही काँग्रेरसच्या नेत्यांनी केली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या ४२१ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये पक्षाला केवळ ५२ जागा जिंकता आल्या होत्या. आता २०१९ पेक्षा कमी जागा लढवण्यास तयार असलेल्या कांग्रेसने विविध राज्यांमधील स्थानिक पक्षांबाबत मवाळ भूमिका घेण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. दरम्यान, काँग्रेसकडून सध्या उचलण्यात येत असलेली पावले काँग्रेसच्या २००१ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या अधिवेशनात सोनिया गांधींनी आखलेल्या रणनीतीने  प्रभावित झालेली दिसत आहेत.

काँग्रेसच्या २००१ मधील अधिवेशनात सोनिया गांधींनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस १५ पक्षांच्या यूपीए या आघाडीसह  अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात मैदानात उतरेल, असे घोषित केले होते. मात्र २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ६ समविचारी  पक्षांसोबत आघाडी केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये टीआरएस, तामिळनाडूमध्ये डीएमके, झारखंडमध्ये जेएमएम आणि बिहारमध्ये आरजेडी-एलजेपीसोबत आघाडी केली होती. त्यावेळी या राज्यांमध्ये काँग्रेसला जबरदस्त फायदा झाला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये कुठल्याही पक्षासोबत आघाडी केली नव्हती. 

आघाडी केलेल्या पाच राज्यांमधील लोकसभेच्या १८८ जागांपैकी ११४  जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी ५६ जागांवर बाजी मारली होती. यावेळीही काँग्रेस २००४ ची रणनीती घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने रायपूरमध्ये झालेल्या आपल्या ८५ व्या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकभा निवडणुकीसाठी २००४ मधील रणनीती वापरण्याचे निश्चित केले होते. 

योगायोगाची बाब म्हणजे २००३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पराभवाचा सामना केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करताना पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. आता त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा