शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Violenceविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे Congressचा फायदा होणार? Prashant Kishore म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:20 IST

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाची परिणती लखीमपूरमधील हिंसाचारात झाली होती. यामध्ये चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. (Lakhimpur Kheri Violence) दरम्यान, लखीमपूरमध्ये घडलेल्या या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे. लखीमपूर प्रकरणावरून काँग्रेसची आक्रमकता आणि राहुल आणि प्रियंका गांधींची सक्रियता यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा अच्छे दिन येतील, अशी शक्यता काँग्रेसमधील नेत्यांसह अनेकजण वर्तवत आहेत. मात्र राजकीय रणनीतीगार प्रशांत किशोर यांनी ही शक्यता खोडून काढणारे विधान केले आहे. (Will Congress benefit from its aggressive stance against Lakhimpur violence? Prashant Kishor Says Congress will not benefit)

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये प्रशांत किशोर म्हणाले की, लखीमपूरमधील घटनेमुळे काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्ष एकजूट होईल, असा विचार जे लोक करत आहेत. त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. दुर्दैवाने देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुळापर्यंत घर केलेल्या समस्या आणि कमकुवत बाजूंबाबत कुठलाही तातडीचा उपाय दिसत नाही आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत प्रशांत किशोर यांनी केलेले हे विधान खूप महत्त्वपूर्ण आहे. २०१४ मध्ये भाजपासाठी रणनीती आखल्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रशांत किशोर यांचे नाव चर्चेत आले होते. तेव्हापासून सातत्याने त्यांचा प्रभाव वाढत गेला. तसेच अनेक राजकीय पक्ष प्रशांत किशोर यांना आपल्यासोबत काम करण्यासाठी आग्रह करत आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोर