शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Violenceविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे Congressचा फायदा होणार? Prashant Kishore म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:20 IST

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाची परिणती लखीमपूरमधील हिंसाचारात झाली होती. यामध्ये चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. (Lakhimpur Kheri Violence) दरम्यान, लखीमपूरमध्ये घडलेल्या या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे. लखीमपूर प्रकरणावरून काँग्रेसची आक्रमकता आणि राहुल आणि प्रियंका गांधींची सक्रियता यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा अच्छे दिन येतील, अशी शक्यता काँग्रेसमधील नेत्यांसह अनेकजण वर्तवत आहेत. मात्र राजकीय रणनीतीगार प्रशांत किशोर यांनी ही शक्यता खोडून काढणारे विधान केले आहे. (Will Congress benefit from its aggressive stance against Lakhimpur violence? Prashant Kishor Says Congress will not benefit)

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये प्रशांत किशोर म्हणाले की, लखीमपूरमधील घटनेमुळे काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्ष एकजूट होईल, असा विचार जे लोक करत आहेत. त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. दुर्दैवाने देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुळापर्यंत घर केलेल्या समस्या आणि कमकुवत बाजूंबाबत कुठलाही तातडीचा उपाय दिसत नाही आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत प्रशांत किशोर यांनी केलेले हे विधान खूप महत्त्वपूर्ण आहे. २०१४ मध्ये भाजपासाठी रणनीती आखल्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रशांत किशोर यांचे नाव चर्चेत आले होते. तेव्हापासून सातत्याने त्यांचा प्रभाव वाढत गेला. तसेच अनेक राजकीय पक्ष प्रशांत किशोर यांना आपल्यासोबत काम करण्यासाठी आग्रह करत आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोर