शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Lakhimpur Kheri Violenceविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे Congressचा फायदा होणार? Prashant Kishore म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:20 IST

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाची परिणती लखीमपूरमधील हिंसाचारात झाली होती. यामध्ये चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. (Lakhimpur Kheri Violence) दरम्यान, लखीमपूरमध्ये घडलेल्या या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे. लखीमपूर प्रकरणावरून काँग्रेसची आक्रमकता आणि राहुल आणि प्रियंका गांधींची सक्रियता यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा अच्छे दिन येतील, अशी शक्यता काँग्रेसमधील नेत्यांसह अनेकजण वर्तवत आहेत. मात्र राजकीय रणनीतीगार प्रशांत किशोर यांनी ही शक्यता खोडून काढणारे विधान केले आहे. (Will Congress benefit from its aggressive stance against Lakhimpur violence? Prashant Kishor Says Congress will not benefit)

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये प्रशांत किशोर म्हणाले की, लखीमपूरमधील घटनेमुळे काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्ष एकजूट होईल, असा विचार जे लोक करत आहेत. त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. दुर्दैवाने देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुळापर्यंत घर केलेल्या समस्या आणि कमकुवत बाजूंबाबत कुठलाही तातडीचा उपाय दिसत नाही आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत प्रशांत किशोर यांनी केलेले हे विधान खूप महत्त्वपूर्ण आहे. २०१४ मध्ये भाजपासाठी रणनीती आखल्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रशांत किशोर यांचे नाव चर्चेत आले होते. तेव्हापासून सातत्याने त्यांचा प्रभाव वाढत गेला. तसेच अनेक राजकीय पक्ष प्रशांत किशोर यांना आपल्यासोबत काम करण्यासाठी आग्रह करत आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोर