शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येचे 'हे' राज्य भाजपला पुन्हा मिळेल की नाही? बोडोलँड पीपल्स फ्रंट बाहेर पडल्याचा बसू शकतो फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:18 IST

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या.  बीपीएफ आता भाजपसोबत नाही.

गुवाहाटी : आसाममध्ये पुन्हा भाजप व मित्रपक्षांना बहुमत मिळेल, असे आतापर्यंत दोन जनमत चाचण्यांच्या निष्कर्षातून दिसून आले आहे. प्रत्यक्ष भाजपलाही आपलेच सरकार येण्याची खात्री वाटत आहे. तरीही गेल्या महिन्याभरात झालेल्या काही राजकीय बदलांमुळे गाफिल राहून चालणार नाही, हेही भाजप नेते ओळखून आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या.  बीपीएफ आता भाजपसोबत नाही. तो काँग्रेसप्रणित महाआघाडीत आहे. गेल्यावेळी काँग्रेसला २६ आणि ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटला (एआययूडीएफ) १३ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा या दोघांची आघाडी नव्हती.  आता ती झाली असून, बीपीएफही सोबत आहे.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी मुस्लिमच नव्हे, तर काही प्रमाणात हिंदूंमध्येही नाराजी आहे. त्यांनाही भारतीय असल्याचे पुरावे सादर करण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी आहेत. याचा फटका भाजपला बसू शकेल, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविषयी नाराजी आहे. हिमांत बिस्वा सर्मा यांचे नाव पुढे करण्याचे भाजपने ठरवले होते. पण निवडणुकीआधी असे केल्यास पक्षातील गटबाजी उफाळून येईल, असे वाटल्याने भाजपने उमेदवारच जाहीर केलेला नाही. 

काँग्रेस आघाडीच्या जागांमध्ये वाढ?गेल्यावेळी भाजपला २९.५१, गण परिषदेला ८.१४ व बीपीएफला ३.९४ याप्रकारे तिघांना मिळून ४१.४९ टक्के मते मिळाली. याउलट स्वतंत्रपणे लढूनही काँग्रेसला ३०.९६, एआययूडीएफला १३.५ अशी ४४ टक्के मते मिळाली. त्यात आता बीपीएफची भर पडल्याने काँग्रेसप्रणीत आघाडीच्या जागांत खूप वाढ होईल, असा अंदाज आहे.  

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Assamआसाम