शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

ईशान्येचे 'हे' राज्य भाजपला पुन्हा मिळेल की नाही? बोडोलँड पीपल्स फ्रंट बाहेर पडल्याचा बसू शकतो फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:18 IST

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या.  बीपीएफ आता भाजपसोबत नाही.

गुवाहाटी : आसाममध्ये पुन्हा भाजप व मित्रपक्षांना बहुमत मिळेल, असे आतापर्यंत दोन जनमत चाचण्यांच्या निष्कर्षातून दिसून आले आहे. प्रत्यक्ष भाजपलाही आपलेच सरकार येण्याची खात्री वाटत आहे. तरीही गेल्या महिन्याभरात झालेल्या काही राजकीय बदलांमुळे गाफिल राहून चालणार नाही, हेही भाजप नेते ओळखून आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या.  बीपीएफ आता भाजपसोबत नाही. तो काँग्रेसप्रणित महाआघाडीत आहे. गेल्यावेळी काँग्रेसला २६ आणि ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटला (एआययूडीएफ) १३ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा या दोघांची आघाडी नव्हती.  आता ती झाली असून, बीपीएफही सोबत आहे.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी मुस्लिमच नव्हे, तर काही प्रमाणात हिंदूंमध्येही नाराजी आहे. त्यांनाही भारतीय असल्याचे पुरावे सादर करण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी आहेत. याचा फटका भाजपला बसू शकेल, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविषयी नाराजी आहे. हिमांत बिस्वा सर्मा यांचे नाव पुढे करण्याचे भाजपने ठरवले होते. पण निवडणुकीआधी असे केल्यास पक्षातील गटबाजी उफाळून येईल, असे वाटल्याने भाजपने उमेदवारच जाहीर केलेला नाही. 

काँग्रेस आघाडीच्या जागांमध्ये वाढ?गेल्यावेळी भाजपला २९.५१, गण परिषदेला ८.१४ व बीपीएफला ३.९४ याप्रकारे तिघांना मिळून ४१.४९ टक्के मते मिळाली. याउलट स्वतंत्रपणे लढूनही काँग्रेसला ३०.९६, एआययूडीएफला १३.५ अशी ४४ टक्के मते मिळाली. त्यात आता बीपीएफची भर पडल्याने काँग्रेसप्रणीत आघाडीच्या जागांत खूप वाढ होईल, असा अंदाज आहे.  

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Assamआसाम