शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

विकली राऊंड..... क्राईम गुन्हेगाराचे वय १८

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

जिल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. १८ ते २० वर्षांचे आरोपी पाहून अनेकवेळा पोलिसांचेही हृदय हेलावते. त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकताना पोलिस आणि न्यायाधिशांच्याही कठोरतेला पाझर फुटत असणार. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात तरुण मुले जेलची हवा खात तरुणाई स्वत:च्याच कर्माने चिरडून टाकतात. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात टाकले जाते, मात्र १८ वर्षांच्यावर वय असलेली मुले आपले भविष्य अंधार कोठडीत डांबून ठेवतात. जेथे मिशाही फुटलेल्या नसतात, तिथे गुन्हेगारीच्या अनेक फांद्या पसरट होतात. त्याची मुळेही खो

जिल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. १८ ते २० वर्षांचे आरोपी पाहून अनेकवेळा पोलिसांचेही हृदय हेलावते. त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकताना पोलिस आणि न्यायाधिशांच्याही कठोरतेला पाझर फुटत असणार. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात तरुण मुले जेलची हवा खात तरुणाई स्वत:च्याच कर्माने चिरडून टाकतात. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात टाकले जाते, मात्र १८ वर्षांच्यावर वय असलेली मुले आपले भविष्य अंधार कोठडीत डांबून ठेवतात. जेथे मिशाही फुटलेल्या नसतात, तिथे गुन्हेगारीच्या अनेक फांद्या पसरट होतात. त्याची मुळेही खोलवर रुजतात. खोड कसे तयार होते, याची अनेक कारणे आहेत. घटस्फोट,आई-वडिलांमध्ये आलेला दुरावा, अनाथ मुलांना न मिळालेला आसरा, व्यसनाधिनता, मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष, पाचवीला पुजलेले दारिद्रय, कमी कष्टात पैसा मिळविण्याचा हव्यास अशी एक ना अनेक कारणे यामध्ये दडलेली आहेत. गुन्हा घडल्यानंतर अशा भावनिक गोष्टींबाबत कायदा कधीच विचार करीत नसतो. गुन्ह्याप्रमाणे शिक्षा होते. मात्र या तरुणांचे पुढे काय ? याचा समाज फारसा विचार करीत नाही. ट्र्रक चालकांना लुटणारी टोळी, वाळू तस्करी, तरुणांचे खून पाडणारे हे कोणी सराईत गुंड नव्हे, तर साधे-सुधे तरूण आहेत. त्यांच्यामध्ये अशी खुनशी वृत्ती का निर्माण होते? याचा विचार करण्यापूर्वीच ते चतुर्भज होतात. आपला तरुण मुलगा कुठे जातो, काय करतो, कोठून पैसे आणतो, घरातून पैसे न देताही तो चैनीच्या वस्तू, मौज-मजा करतो, हे आपल्या मुलांना विचारण्याचे धाडस पालकांमध्ये नसल्यानेच गुन्हेगारीचे वय १८ च्या आत येऊ लागले आहे. यासाठी प्रबोधनापेक्षाही पालकांचा आणि कायद्याचा धाक हवा आहे. गुन्ह्यांचा तपास वेगाने झाला, शिक्षा एक वर्षाच्या आत लागली तरच कायद्याचा आणि पोलिसांचाही धाक निर्माण होईल. पोलिसांची तपास प्रक्रिया वेळकाढू आणि लांबणारी असेल तर एकामागून एक नवे गुन्हेगार तयार होतील. तरुणांच्या टोळ्यांचा पोलिसांनी आधीच बंदोबस्त केला, तरच गुन्हेगारीच्या जाळ्यात तरुण अडकणार नाहीत. गुन्हेगारीपासून परावृत्त करणारी पर्यायी व्यवस्था नसणे जेवढी खेदजनक तेवढीच गंभीर आणि समाजासाठी घातक ठरणार आहे.