शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
4
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
5
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
6
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
7
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
8
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
9
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
10
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
11
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
14
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
15
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
16
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
17
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
18
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 1:07 PM

नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे

ठळक मुद्दे  अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?.

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचं संसदेतील भाषण चर्चेचा विषय बनलं आहे. कोरोना विषयावरील चर्चासत्रात खासदार कोल्हेंनी तुफान फटकेबाजी करताना मोदी सरकारला लक्ष्य केले. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुकही केले. तर, मोदी सरकारवर जबरी टीका केली होती. कोल्हेंच्या या टीकेला आता भाजपा नेते आणि अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. 

खासदार कोल्हेंनी कोरोना कालावधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची जबाबदारी मोदी सरकार घेणार का, असे म्हटले. डॉ. कोल्हेंनी मोदींना उद्देशून कवितेच्या माध्यमातून टोला लगावला. "अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो,पराजय का बोझ भी स्वीकारना होगा"'जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी', असे कोल्हेंनी म्हटले होते. कोल्हेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, राज्यातील ST कामगारांच्या डेथ सर्टीफिकेटवर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न केला एबीपी माझाशी बोलताना आहे.    अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?. नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे. तसेच, राजकारण करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर द्यायला कमी पडणार नाही. सरकारच्या काळातील आत्महत्येनुसार फोटो छापायला लागले तर सर्वात जास्त डेथ सर्टिफिकेटवर महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लागतील, दुसरे कोणाचेही नाही, असे म्हणत सुजय विखे यांनी अमोल कोल्हेंच्या टीकेवरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. 

तिन्ही नेत्यांना भारतरत्न द्यावा

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमदील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना प्रत्येकी एक-एक भारतरत्न द्यायला हवा, एवढं त्यांचं काम कौतुकास्पद आहे. यांनी ग्लोबल टेंडर काढलं होतं, एक तरी लस विकत घेतली का? असा सवाल सुजय विखेंनी विचारला. संसदेत काल बुस्टर डोसची चर्चा झाली, त्यावर स्वत: WHO ने बुस्टर डोसची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेलाही सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिलं.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेUddhav Thackerayउद्धव ठाकरेST Strikeएसटी संपFarmerशेतकरी