शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

लॉकडाउन काळात मुस्लीम समुदायावरच जास्त गुन्हे का?, हायकोर्टाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 10:36 IST

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राघवेंद्रसिंह चौहान आणि न्यायमूर्ती बी विजयसेन रेड्डी यांच्या खंडपीठाने यांनी पोलिसांविरुद्धच्या भूमिकेबद्दल दाखल याचिकेवर सुनावणी केली.

हैदराबाद - तेलंगणा उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करतेवेळी पोलिसांना चांगलंच फटकारलं आहे. देशातील लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे मुस्लीम समुदायातील नागरिकांवरच का नोंद झाले आहेत? असा सवालच न्यायालयाने विचारला आहे. तसेच, इतर समाजातील नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले नाही का? असेही हैदराबादपोलिसांना हायकोर्टाने विचारले. 

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राघवेंद्रसिंह चौहान आणि न्यायमूर्ती बी विजयसेन रेड्डी यांच्या खंडपीठाने यांनी पोलिसांविरुद्धच्या भूमिकेबद्दल दाखल याचिकेवर सुनावणी केली. अमेरिकेत पाहा, एका आफ्रिकी नागरिकास पोलिसांनी मारहाण केली अन् संपूर्ण देश पेटून उठला आहे. देशातही लॉकडाउन काळात पोलिसांचा अल्पसंख्यांक समुदायासोबत व्यवहार क्रूर असल्याचेही हायकोर्टाने म्हटले. 

हैदराबाद पोलिसांच्या वर्तुणुकीबद्दल सामाजिक कार्यकर्ता शीला सारा मैथ्थूज यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेतून पोलिसांनी मुस्लीम समाजातील युवकांवर अन्याय केल्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. शीला यांचे वकिल दिपक मिश्र यांनी जुनैद नावाच्या युवकाचा संदर्भ दिला, ज्याला पोलिसांच्या मारहाणीत तब्बल 35 टाके पडले आहेत. विशेष म्हणजे जुनैद हा प्रवासी मजदुरांना जेवण पुरविण्याचं काम लॉकडाउन काळात करत होता. त्याच दरम्यान, पोलीस हवालदाराने जुनैद यास जबर मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आपली बाजू मांडताना, कुठल्याही पीडित व्यक्तीने तसा जबाब दिला नसल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकत फेटाळून लावली. आणखी एका प्रकरणात मोहम्मद असगर नावाचा युवक पोलिसांच्या भितीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. त्यामध्ये, तो गंभीर जमखी झाला आहे. याप्रकरणी न्यायालयाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित पोलीस हवालदारांवर 20 जूनपर्यंत कारवाई करुन न्यायालयात अहवाल सादर करण्याचेही बजावले आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMuslimमुस्लीमPoliceपोलिसhyderabad-pcहैदराबादTelanganaतेलंगणा