शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

का पेट घेतात इलेक्ट्रिक बाइक?; ई-बाईकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 07:53 IST

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात

गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आतापर्यंत अशा सात घटनांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत ई-बाइकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात जाणून घेऊ या.

इलेक्ट्रिक वाहनबाजाराची स्थिती

२०१२ सरकारने ‘नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन २०२०’ योजना जारी केली. २०२०-२१ या काळात विक्री झालेल्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे १.३% प्रमाण हाेते. २०२१-२२ या कालावधीत विक्रीचे प्रमाण १.७% पोहोचले आहे. २०३० पर्यंत वाहन क्षेत्रात इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीचा हिस्सा ३०%पर्यंत पोहोचावा, अशी योजना आहे.

कोणत्या बॅटऱ्या वापरल्या जातात?ई-बाइकमध्ये लिथियम-आयन अर्थात लि-आयन या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्येही या बॅटऱ्यांचा वापर केला जातो.इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत या वजनाने हलक्या आणि अधिक कार्यक्षम असल्याचे मानले जाते.या बॅटऱ्या चार्जिंगवेळी अधिक तापल्यानेच आतापर्यंतच्या दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांना कोण प्रमाणित करते?ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात. इलेक्ट्रिक गाड्यांच्या चाचण्यांबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.चीनकडून आयात होणाऱ्या हलक्या दर्जाच्या सेलबाबत तज्ज्ञांनी निषेध केला असून हा प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ई-बाइकला आग लागू नये म्हणून...

ज्या कंपनीने ई-बाइक बनवली आहे त्यांच्या चार्जरनेच गाडीचे चार्जिंग करा. गाडी पाण्यात भिजली असेल तर लगेचच चार्जिंग करू नका. चीननिर्मित बॅटऱ्यांऐवजी भारतात तयार केलेल्या बॅटऱ्यांचा आग्रह धरा. गाडी रात्रभर चार्जिंगला ठेवू नका. ड्रायव्हिंगवेळी जळाल्याचा वास आल्यास दुर्लक्ष करू नका. लगेचच तपासणी करा.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कार