शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 17:18 IST

प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

रांची - झारखंड येथील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य कराव असं आव्हान त्यांनी दिलं. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की विभाजनाचे आहे त्याचे उत्तर द्या असंही प्रियंका गांधी म्हणाल्या. झारखंड येथील पाकुड येथे त्यांची जाहीरसभा होती. 

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, ज्याप्रकारे तुम्ही या मैदानतल्या खुर्ची हटवत आहात त्याचप्रकारे तुम्हाला या सरकारला खुर्चीवरुन हटवायचे आहे. जे तुमच्या हिताचं सरकार आहे ते निवडा. विचार करुन मतदान करावे. झारखंडमध्ये प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला आव्हान दिलं पण देशातील समस्यांवर मोदी मौन बाळगून आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या नावावर भाजपा लोकांचे विभाजन करत आहे असा आरोप त्यांनी केला. 

या प्रचारसभेदरम्यान उपस्थित लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. एकमेकांवर खुर्ची फेकण्याचं काम लोकांनी केलं. त्यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केलं. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, याठिकाणचं पाणी-जंगल आणि जमीन तुमची आहे. ही झारखंडच्या अस्तित्वाची लढाई आहे. भाजपाची विचारधारा कमकुवत आहे. आदिवासी संस्कृतीवर घाळा घालण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतो असा आरोप त्यांनी केला. 

तसेच इंदिरा गांधी यांनी आजीवन तुमच्यासाठी काम केलं आहे, गरिबांसाठी कल्याणकारी योजना त्यांना राबविल्या. भाजपा सरकारने तुमच्या जमिनी बळकावल्या. उत्तर प्रदेशात आदिवासी लोकांच्या हत्या केल्या गेल्या. जमिनी बळकविण्याच्या प्रयत्नात रक्तपात केला असा आरोपही प्रियंका गांधी यांनी भाजपावर केला आहे. 

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोजगार नाही, उद्योग नाही, बेरोजगारी, शिक्षण, गरिबी, महिला सुरक्षा यावर सरकार काय काम करतंय? मोदी सरकारने श्रीमंतांची कर्ज माफ केली. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाहीत. कांदा, डाळ, पेट्रोल, डिझेल सर्व महाग झाले आहे. सरकारने देशातील अनेक कंपन्या विकून टाकल्या. रेल्वे आणि एअरपोर्टदेखील विकणार आहेत असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019