शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 17:18 IST

प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

रांची - झारखंड येथील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य कराव असं आव्हान त्यांनी दिलं. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की विभाजनाचे आहे त्याचे उत्तर द्या असंही प्रियंका गांधी म्हणाल्या. झारखंड येथील पाकुड येथे त्यांची जाहीरसभा होती. 

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, ज्याप्रकारे तुम्ही या मैदानतल्या खुर्ची हटवत आहात त्याचप्रकारे तुम्हाला या सरकारला खुर्चीवरुन हटवायचे आहे. जे तुमच्या हिताचं सरकार आहे ते निवडा. विचार करुन मतदान करावे. झारखंडमध्ये प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला आव्हान दिलं पण देशातील समस्यांवर मोदी मौन बाळगून आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या नावावर भाजपा लोकांचे विभाजन करत आहे असा आरोप त्यांनी केला. 

या प्रचारसभेदरम्यान उपस्थित लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. एकमेकांवर खुर्ची फेकण्याचं काम लोकांनी केलं. त्यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केलं. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, याठिकाणचं पाणी-जंगल आणि जमीन तुमची आहे. ही झारखंडच्या अस्तित्वाची लढाई आहे. भाजपाची विचारधारा कमकुवत आहे. आदिवासी संस्कृतीवर घाळा घालण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतो असा आरोप त्यांनी केला. 

तसेच इंदिरा गांधी यांनी आजीवन तुमच्यासाठी काम केलं आहे, गरिबांसाठी कल्याणकारी योजना त्यांना राबविल्या. भाजपा सरकारने तुमच्या जमिनी बळकावल्या. उत्तर प्रदेशात आदिवासी लोकांच्या हत्या केल्या गेल्या. जमिनी बळकविण्याच्या प्रयत्नात रक्तपात केला असा आरोपही प्रियंका गांधी यांनी भाजपावर केला आहे. 

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोजगार नाही, उद्योग नाही, बेरोजगारी, शिक्षण, गरिबी, महिला सुरक्षा यावर सरकार काय काम करतंय? मोदी सरकारने श्रीमंतांची कर्ज माफ केली. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाहीत. कांदा, डाळ, पेट्रोल, डिझेल सर्व महाग झाले आहे. सरकारने देशातील अनेक कंपन्या विकून टाकल्या. रेल्वे आणि एअरपोर्टदेखील विकणार आहेत असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019