शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 17:18 IST

प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

रांची - झारखंड येथील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य कराव असं आव्हान त्यांनी दिलं. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की विभाजनाचे आहे त्याचे उत्तर द्या असंही प्रियंका गांधी म्हणाल्या. झारखंड येथील पाकुड येथे त्यांची जाहीरसभा होती. 

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, ज्याप्रकारे तुम्ही या मैदानतल्या खुर्ची हटवत आहात त्याचप्रकारे तुम्हाला या सरकारला खुर्चीवरुन हटवायचे आहे. जे तुमच्या हिताचं सरकार आहे ते निवडा. विचार करुन मतदान करावे. झारखंडमध्ये प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला आव्हान दिलं पण देशातील समस्यांवर मोदी मौन बाळगून आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या नावावर भाजपा लोकांचे विभाजन करत आहे असा आरोप त्यांनी केला. 

या प्रचारसभेदरम्यान उपस्थित लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. एकमेकांवर खुर्ची फेकण्याचं काम लोकांनी केलं. त्यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केलं. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, याठिकाणचं पाणी-जंगल आणि जमीन तुमची आहे. ही झारखंडच्या अस्तित्वाची लढाई आहे. भाजपाची विचारधारा कमकुवत आहे. आदिवासी संस्कृतीवर घाळा घालण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतो असा आरोप त्यांनी केला. 

तसेच इंदिरा गांधी यांनी आजीवन तुमच्यासाठी काम केलं आहे, गरिबांसाठी कल्याणकारी योजना त्यांना राबविल्या. भाजपा सरकारने तुमच्या जमिनी बळकावल्या. उत्तर प्रदेशात आदिवासी लोकांच्या हत्या केल्या गेल्या. जमिनी बळकविण्याच्या प्रयत्नात रक्तपात केला असा आरोपही प्रियंका गांधी यांनी भाजपावर केला आहे. 

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोजगार नाही, उद्योग नाही, बेरोजगारी, शिक्षण, गरिबी, महिला सुरक्षा यावर सरकार काय काम करतंय? मोदी सरकारने श्रीमंतांची कर्ज माफ केली. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाहीत. कांदा, डाळ, पेट्रोल, डिझेल सर्व महाग झाले आहे. सरकारने देशातील अनेक कंपन्या विकून टाकल्या. रेल्वे आणि एअरपोर्टदेखील विकणार आहेत असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019