शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:04 IST

Akhilesh Yadav on Operation Sindoor: खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या तपासाचा हवाला देत सरकार पुलवामामध्ये आरडीएक्स आणण्यासाठी वापरलेली गाडी का शोधत नाहीये? असा सवाल केला.

Akhilesh Yadav News:'ऑपरेशन सिंदूर' मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. या विषयावर बोलताना खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या वेळेवरून शंका उपस्थित केला. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यासाठी ज्या गाडीतून आरडीएक्स आणले गेले, ती गाडी अजूनही का पकडली गेली नाही? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी भाजपवर राजकीय फायदा घेणारा पक्ष म्हणत निशाणा साधला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अखिलेश यादव लोकसभेत बोलताना म्हणाले, "भारतीय लष्कराने शौर्याचा परिचय देत पराक्रम केला. त्याबद्दल मी लष्कराने अभिनंदन करतो. पण, आता मी ऐकत होतो की, दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवादी मारले गेले, त्याबाबतीत आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहोत. मात्र, प्रत्येक ठिकाणी राजकीय फायदा कोण घेत आहे? आज ऑपरेशन ऑपरेशनबद्दल मी सरकारचे अभिनंदन का करत नाहीये? जेव्हा राजकीय पाठिंबा देण्याची वेळ आली, तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत होते." 

ती गाडी आजपर्यंत का पकडण्यात आली नाही?

खासदार अखिलेश यादव पुढे बोलताना म्हणाले, "मग दहशतवादी चकमकीत कालच (२८ जुलै) का मारले गेले? आणि पुन्हा त्या विषयाचा मी उल्लेख करत आहे, ज्यामुळे पहलगाम झाले. ज्यामुळे पुलवामा झाले. जर यांना इतकंच तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींबद्दल माहिती आहे; तर मग पुलवामामध्ये गाडीतून आरडीएक्स आणले गेले, ती गाडी आजपर्यंत का पकडण्यात आली नाही?", असा सवाल अखिलेश यादव यांनी केला. 

"भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कदाचित हे माहिती असेल की, सरकारचे अनेक विभाग असतात, जे सॅटेलाईट इमेजस् देतात. जर आजही भाजपची इच्छा असेल, तर पुलवामामध्ये जी गाडी आली होती, सॅटेलाईट इमेजच्या मदतीने तिच्याबद्दल माहिती मिळू शकते की, कोणत्या मार्गाने ती गाडी आली होती? मग ती गाडी शोधण्यासाठी तुम्ही हिंमत का करत नाहीये?", असा सवाल करत अखिलेश यादव यांनी सरकारला घेरले. 

'सहा महिन्यात पीओके घेऊ म्हणाले होते'

"शिष्टमंडळात पाठवणाऱ्या व्यक्तींचा निर्णय सरकार घेऊ शकत नाही, राजकीय पक्ष ते ठरवतात. मग राजकारण कोण करत आहे? राजकारण करणारे हे लोक निवडणुकींच्या भाषणांमध्ये म्हणत होते की, आम्ही सहा महिन्यात पीओके घेऊ. अक्साई चीन घेऊ. आम्हाला युद्ध नकोय, पण सीमेवर शांती हवी. हे युद्ध पाकिस्तानसोबत नव्हते. तुम्ही कितीही लपा, लपवा. ही लढाई तुम्हाला चीनसोबत लढावी लागली", असे अखिलेश यादव म्हणाले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसद