शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:04 IST

Akhilesh Yadav on Operation Sindoor: खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या तपासाचा हवाला देत सरकार पुलवामामध्ये आरडीएक्स आणण्यासाठी वापरलेली गाडी का शोधत नाहीये? असा सवाल केला.

Akhilesh Yadav News:'ऑपरेशन सिंदूर' मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. या विषयावर बोलताना खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या वेळेवरून शंका उपस्थित केला. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यासाठी ज्या गाडीतून आरडीएक्स आणले गेले, ती गाडी अजूनही का पकडली गेली नाही? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी भाजपवर राजकीय फायदा घेणारा पक्ष म्हणत निशाणा साधला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अखिलेश यादव लोकसभेत बोलताना म्हणाले, "भारतीय लष्कराने शौर्याचा परिचय देत पराक्रम केला. त्याबद्दल मी लष्कराने अभिनंदन करतो. पण, आता मी ऐकत होतो की, दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवादी मारले गेले, त्याबाबतीत आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहोत. मात्र, प्रत्येक ठिकाणी राजकीय फायदा कोण घेत आहे? आज ऑपरेशन ऑपरेशनबद्दल मी सरकारचे अभिनंदन का करत नाहीये? जेव्हा राजकीय पाठिंबा देण्याची वेळ आली, तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत होते." 

ती गाडी आजपर्यंत का पकडण्यात आली नाही?

खासदार अखिलेश यादव पुढे बोलताना म्हणाले, "मग दहशतवादी चकमकीत कालच (२८ जुलै) का मारले गेले? आणि पुन्हा त्या विषयाचा मी उल्लेख करत आहे, ज्यामुळे पहलगाम झाले. ज्यामुळे पुलवामा झाले. जर यांना इतकंच तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींबद्दल माहिती आहे; तर मग पुलवामामध्ये गाडीतून आरडीएक्स आणले गेले, ती गाडी आजपर्यंत का पकडण्यात आली नाही?", असा सवाल अखिलेश यादव यांनी केला. 

"भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कदाचित हे माहिती असेल की, सरकारचे अनेक विभाग असतात, जे सॅटेलाईट इमेजस् देतात. जर आजही भाजपची इच्छा असेल, तर पुलवामामध्ये जी गाडी आली होती, सॅटेलाईट इमेजच्या मदतीने तिच्याबद्दल माहिती मिळू शकते की, कोणत्या मार्गाने ती गाडी आली होती? मग ती गाडी शोधण्यासाठी तुम्ही हिंमत का करत नाहीये?", असा सवाल करत अखिलेश यादव यांनी सरकारला घेरले. 

'सहा महिन्यात पीओके घेऊ म्हणाले होते'

"शिष्टमंडळात पाठवणाऱ्या व्यक्तींचा निर्णय सरकार घेऊ शकत नाही, राजकीय पक्ष ते ठरवतात. मग राजकारण कोण करत आहे? राजकारण करणारे हे लोक निवडणुकींच्या भाषणांमध्ये म्हणत होते की, आम्ही सहा महिन्यात पीओके घेऊ. अक्साई चीन घेऊ. आम्हाला युद्ध नकोय, पण सीमेवर शांती हवी. हे युद्ध पाकिस्तानसोबत नव्हते. तुम्ही कितीही लपा, लपवा. ही लढाई तुम्हाला चीनसोबत लढावी लागली", असे अखिलेश यादव म्हणाले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसद