शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

नितीन गडकरींनी देवेंद्र यांच्यासाठी 'सत्तेचा महामार्ग' का बांधला नाही?... वाचा त्यांचंच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:43 IST

विधानसभा निवडणूक निकालापर्यंतचा सगळा प्रवास व्यवस्थित झाला असताना, महाराष्ट्रात एक 'स्पीड ब्रेकर' आला आणि अपघात झाला.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांनी भाजपा-शिवसेनेत मैत्रीचा पूल का बांधला नाही?देवेंद्र फडणवीस सक्षम होते. ते प्रयत्न करत होतेः नितीन गडकरीमला दिल्ली सोडायची नाही. मलाही जायचं नाही आणि मला कुणी पाठवतही नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण झालेल्या सत्तापेचातून तोडगा काढण्यासाठी भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फारसे पुढे आल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. 'राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं', या त्यांच्या विधानाची बरीच चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे ते खरंही झालं होतं. परंतु, शेवटच्या चेंडूवर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीनं सत्तास्थापनेचा विजयी षटकार ठोकला आणि आता सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी बाकांवर बसला आहे. या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरी यांनी भाजपा-शिवसेनेत मैत्रीचा पूल का बांधला नाही, भाजपासाठी - देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सत्तेचा महामार्ग का बनवला नाही, असे प्रश्नही अनेकांच्या मनात आहेत. त्यांचं उत्तर नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत दिलं.       

विधानसभा निवडणूक निकालापर्यंतचा सगळा प्रवास व्यवस्थित झाला असताना, महाराष्ट्रात एक स्पीड ब्रेकर आल्यानं अपघात झाला होता. हा अपघात टाळण्यासाठी तुम्ही काही केलं नाही का, या प्रश्नावर नितीन गडकरी गमतीनं म्हणाले की, माझ्या खात्याचा रस्ते सुरक्षा कायदा तिथे लागू नव्हता. म्हणजेच, त्या विषयाची जबाबदारी माझ्याकडे नव्हती. देवेंद्र फडणवीस सक्षम होते. ते प्रयत्न करत होते. त्यांना मदत लागेल तेव्हा आम्ही बोलत होतो. परंतु, मी काही करायचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी नेमकं काय झालं हे देवेंद्र फडणवीस किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहाच सांगू शकतील, असं गडकरींनी 'आज तक'च्या कार्यक्रमात स्पष्ट केलं.

देवेंद्र यांच्यासाठी तुम्ही रस्ता बांधणार नाही का, असं विचारताच, रस्त्याच्या कामासाठी आधी टेंडर निघतं, मग कॉन्ट्रॅक्ट मिळतं आणि नंतर वर्क ऑर्डर निघते, असं ते हसत हसत म्हणाले. 

मी डिप्लोमसी करत नाही!

सत्तापेचावेळी मुख्यमंत्रिपदासाठीही नितीन गडकरींच्या नावाची चर्चा झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि शिवसेनेचीही त्यांच्या नावाला संमती असल्याचं बोललं गेलं होतं. त्याबाबत विचारताच, या सगळ्या चर्चा नितीन गडकरींनी खोडून काढल्या. मी राजकारणी नाही. मी डिप्लोमसी करत नाही. जे बोलतो ते मी करतो. काही वर्षांपूर्वी मला दिल्लीत यायची इच्छा नव्हती. पण, भाजपाध्यक्ष म्हणून मी दिल्लीत आलो आणि आता मला दिल्ली सोडायची नाही. मलाही जायचं नाही आणि मला कुणी पाठवतही नाही, असं नमूद करत त्यांनी 'महाराष्ट्र वापसी'च्या चर्चांवर पडदा टाकला.  

राज्यातील सत्ताही निश्चितच महत्त्वाची आहे. पण, मला जे काम करायची संधी मिळालीय, त्यावर माझा फोकस आहे. राजकारणापेक्षा काही टार्गेट मी निश्चित केली आहेत, ती मला पाच वर्षात पूर्ण करायची आहेत, असं गडकरी म्हणाले. नमामि गंगे, बद्रीनाथ-केदारनाथ आणि मानसरोवरला जाणं सुकर करणारा मार्ग, मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे हे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धारच त्यांनी केला आहे. 

विकासाच्या कामात राजकारण करणं मला आवडत नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, असदुद्दीन ओवैसी, अरविंद केजरीवाल या सगळ्यांना आपण विकासकामांमध्ये सर्वतोपरी मदत केल्याचंही गडकरींनी नमूद केलं. 

केवळ संधीसाधू राजकारण!

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार किती काळ टिकेल, या प्रश्नावर गडकरींनी थेट उत्तर दिलं नाही. मात्र, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला चिमटा काढला. जे कधी एकमेकांना भेटत नसत, एकमेकांकडे पाहून हसत नसत, ते संधीसाधू राजकारणासाठी एकत्र आले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही समस्या असल्याचंही ते म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी