अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्ध सुरू झाले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी ताब्यात घेतली आहे. हा सागरी मार्ग रोखला आहे. दरम्यान, तेहरानने भारतीय जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
परराष्ट्र मंत्री म्हणाले की, संवादाचे निकाल मिळतात आणि ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या, मी त्यांच्याशी संवादात गुंतलो आहे आणि या चर्चेचे काही निकाल लागले आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. जर मला यातून निकाल येत असल्याचे दिसले, तर मी नक्कीच हा संवाद सुरू ठेवेन, असेही एस जयशंकर म्हणाले.
एस जयशंकर म्हणाले, "भारताच्या दृष्टिकोनातून निश्चितच आपण चर्चा करणे, समन्वय साधणे आणि तोडगा काढणे चांगले. भारतीय ध्वजांकित जहाजांसाठी इराणसोबत कोणतीही व्यापक व्यवस्था नाही आणि जहाजांची प्रत्येक हालचाल ही एक वैयक्तिक घटना आहे. त्यांनी इराणला त्या बदल्यात काहीही मिळाले हे देखील नाकारले. जयशंकर म्हणाले की, दिल्ली आणि तेहरानचा एकमेकांशी व्यवहार करण्याचा इतिहास आहे आणि त्याच आधारावर त्यांनी वाटाघाटी केल्या.
होर्मुझमध्ये अनेक जहाजे
हा देवाणघेवाणीचा मुद्दा नाही. भारत आणि इराणमध्ये संबंध आहेत. आम्ही या संघर्षाला अत्यंत दुर्दैवी मानतो. ही फक्त सुरुवात आहे. आमच्याकडे तिथे बरीच जहाजे आहेत. त्यामुळे, हे एक स्वागतार्ह पाऊल असले तरी, यावर काम सुरू असल्याने चर्चा सुरू आहे, असेही एस जयशंकर म्हणाले.
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून द्रवीभूत पेट्रोलियम वायू वाहून नेणारे दोन भारतीय ध्वजधारी टँकर सुरक्षितपणे बाहेर पडले. हा सामुद्रधुनी पर्शियन आखातापासून अरबी समुद्रापर्यंतचा एकमेव मार्ग आहे.
Web Summary : Amidst Middle East tensions, Iran allowed Indian ships through Hormuz. Jaishankar revealed ongoing dialogue led to this. No broad agreement exists, each passage is individually negotiated based on historical ties. India views de-escalation as crucial, continuing discussions for safe passage of its vessels.
Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच, ईरान ने भारतीय जहाजों को होर्मुज से जाने दिया। जयशंकर ने बताया कि जारी वार्ता के कारण यह संभव हुआ। कोई व्यापक समझौता नहीं है, प्रत्येक मार्ग पर ऐतिहासिक संबंधों के आधार पर व्यक्तिगत रूप से बातचीत की जाती है। भारत तनाव कम करने को महत्वपूर्ण मानता है, जहाजों के सुरक्षित मार्ग के लिए बातचीत जारी है।