शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर ५ मिनिटांनी भारताने का लावला पाकिस्तानला फोन?; CDS चौहान यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:48 IST

हा भारतात घडलेला पहिला दहशतवादी हल्ला नाही. देशात याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झालेत असं त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरबाबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी मोठा खुलासा केला आहे. दहशतवादी तळांना टार्गेट केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला माहिती देण्यात आली. हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानला फोन करून जर तुम्ही प्रतिहल्ला केला तर पुढच्या वेळी याहून ताकदीने उत्तर देऊ असं बजावले. भारताचे टार्गेट केवळ दहशतवाद्यांना संपवण्याचं होते असं त्यांनी खुलासा केला.

अलीकडेच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या फ्यूचर वॉर्स अँन्ड वारफेयर कार्यक्रमात सीडीएस अनिल चौहान यांनी सहभाग घेतला. त्यावेळी ते म्हणाले की, डिजीएमओने दहशतवादी तळांना टार्गेट केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला फोन करून त्याची माहिती दिली होती. आम्ही पाकिस्तानी जनरलला जर तुम्ही पुन्हा हल्ला केला तर यापेक्षाही ताकदीने कठोर उत्तर देऊ असं बजावले. आमच्याकडे पाकिस्तानपेक्षा कित्येक पट जास्त खतरनाक शस्त्रे आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच पहलगाममध्ये जे घडले ते क्रूर होते. हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबासमोर, मुलांसमोर धर्माच्या नावाने गोळ्या घातल्या गेल्या. हे सहन केले जाऊ शकत नाही. त्यातून समाजात द्वेष निर्माण होतो. हा भारतात घडलेला पहिला दहशतवादी हल्ला नाही. देशात याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झालेत. भारत दहशतवादाचा सर्वात जास्त बळी पडलेला आहे. त्यामुळे २० हजाराहून अधिक भारतीय मारले गेलेत असं सीडीएस अनिल चौहान यांनी म्हटलं.

 

पाकच्या ड्रोन हल्ल्यावर काय बोलले?

दरम्यान, भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हल्ले अयशस्वी केले. आम्हाला ठाऊक होते, आमच्याकडे उत्तम काऊन्टर ड्रोन सिस्टम आहे. दोन्ही देशांनी वेगवेगळ्या प्रकारे सक्षम बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निश्चित ऑपरेशन सिंदूर जोखमीचे होते हे माहिती होते. परंतु आपली जेवढी क्षमता आहे, तेवढी युद्धाच्या मैदानात वापरण्यात आलीच नाही असंही सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी