शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

'ऑपरेशन सिंदूर'नंतर ५ मिनिटांनी भारताने का लावला पाकिस्तानला फोन?; CDS चौहान यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:48 IST

हा भारतात घडलेला पहिला दहशतवादी हल्ला नाही. देशात याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झालेत असं त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरबाबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी मोठा खुलासा केला आहे. दहशतवादी तळांना टार्गेट केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला माहिती देण्यात आली. हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानला फोन करून जर तुम्ही प्रतिहल्ला केला तर पुढच्या वेळी याहून ताकदीने उत्तर देऊ असं बजावले. भारताचे टार्गेट केवळ दहशतवाद्यांना संपवण्याचं होते असं त्यांनी खुलासा केला.

अलीकडेच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या फ्यूचर वॉर्स अँन्ड वारफेयर कार्यक्रमात सीडीएस अनिल चौहान यांनी सहभाग घेतला. त्यावेळी ते म्हणाले की, डिजीएमओने दहशतवादी तळांना टार्गेट केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला फोन करून त्याची माहिती दिली होती. आम्ही पाकिस्तानी जनरलला जर तुम्ही पुन्हा हल्ला केला तर यापेक्षाही ताकदीने कठोर उत्तर देऊ असं बजावले. आमच्याकडे पाकिस्तानपेक्षा कित्येक पट जास्त खतरनाक शस्त्रे आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच पहलगाममध्ये जे घडले ते क्रूर होते. हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबासमोर, मुलांसमोर धर्माच्या नावाने गोळ्या घातल्या गेल्या. हे सहन केले जाऊ शकत नाही. त्यातून समाजात द्वेष निर्माण होतो. हा भारतात घडलेला पहिला दहशतवादी हल्ला नाही. देशात याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झालेत. भारत दहशतवादाचा सर्वात जास्त बळी पडलेला आहे. त्यामुळे २० हजाराहून अधिक भारतीय मारले गेलेत असं सीडीएस अनिल चौहान यांनी म्हटलं.

 

पाकच्या ड्रोन हल्ल्यावर काय बोलले?

दरम्यान, भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हल्ले अयशस्वी केले. आम्हाला ठाऊक होते, आमच्याकडे उत्तम काऊन्टर ड्रोन सिस्टम आहे. दोन्ही देशांनी वेगवेगळ्या प्रकारे सक्षम बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निश्चित ऑपरेशन सिंदूर जोखमीचे होते हे माहिती होते. परंतु आपली जेवढी क्षमता आहे, तेवढी युद्धाच्या मैदानात वापरण्यात आलीच नाही असंही सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी