शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अंजू भारतात का परतली? मुलांना घेऊन पाकिस्तानात पुन्हा जाणार? चौकशीत उलगडलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:48 IST

अंजूने पाकिस्तानात जाऊन नसरूल्लाशी इस्लामिक पद्धतीने विवाह केल्याचेही सांगितलं

भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजू का परत आली आहे, ती कायमची भारतात आली आहे की पाकिस्तानात परतणार आहे? त्यांचा भारतात येण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये आयबी आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचरांनी अंजूची अनेक तास चौकशी केली. यावेळी तिने काही खुलासे केले. अंजूने सांगितले की, ती २१ जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानी नागरिक नसरुल्लासोबत लग्न करण्यापूर्वी तिने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर तिने इस्लामिक रितीरिवाजांनुसार नसरुल्लाशी लग्न केले. मात्र, चौकशीदरम्यान अंजूने सांगितले की, सध्या तिच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतेही कागदपत्र नाहीत.

'माझा पाकिस्तानी लष्कराशी संबंध नाही'

आयबी आणि पोलिसांनी अंजूची पाकिस्तानी संरक्षण कर्मचार्‍यांसोबतच्या संबंधांबद्दल चौकशी केली, ज्यात तिने सांगितले की तिचा पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कर्मचार्‍यांशी संबंध नाही किंवा ती सैन्यात कोणाला ओळखत नाही. अंजूबाबत सर्वसामान्यांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण अंजू मात्र आपल्या उत्तरांवर ठाम आहे.

अंजू पतीला घटस्फोट देऊन पुन्हा पाकिस्तानात जाणार

पोलिसांनी अंजूला पाकिस्तानात परत जाण्याबाबतही विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अंजूने सांगितले की, ती पती अरविंदला घटस्फोट देण्यासाठी भारतात आली आहे. तिने असेही सांगितले की या काळात ती आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या दोन्ही मुले अरविंद सोबत राहतात.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतDivorceघटस्फोटPoliceपोलिस