शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अमित शहा यांचा शिवसेनेवर राग का?, २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:42 IST

महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्यासाठी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा का केली नाही?

हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्यासाठी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा का केली नाही? कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी तर अमित शहा यांनी जागा वाटपाबाबत बंद दरवाजाआड उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती आणि हा मुद्दा सोडविला होता. त्यावेळी जागा वाटपावरून शिवसेनेने ताठर भूमिका घेतली होती. मग आता नेमके काय झाले? अमित शहा शिवसेनेवर का रागावलेले आहेत?यावेळी मात्र अमित शहा ना मुंबईला आले ना उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. विधानसभा निवडणुकांनंतर त्यांनी गप्प राहणेच पसंत केले. निवडणुकीपूर्वी, ‘लोकमत’शी अनौपचारिकपणे बोलताना अमित शहा यांनी सत्तेचा ५० : ५० टक्के फॉर्म्युला असल्याचे नाकारले होते. हा राजकीय पेच सोडविण्यासाठी त्यांनी कोणताही पुढाकार घेतला नाही आणि शिवसेनेला अन्य पर्याय खुले असल्याचे सांगितले. विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने आपला सूर बदलला आणि आक्रमक भूमिकेत मर्यादा ओलांडल्या. भाजप सूत्रांचे असे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांनी विधाने करण्याऐवजी अमित शहा यांच्यासोबत बैठकीसाठी आग्रह धरायला हवा होता; पण शिवसेनेच्या या भूमिकेनंतर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा निर्णय केला की, शिवसेनेला काय करायचे ते करू द्या. आता २४ नोव्हेंबर रोजी आशेचा किरण आहे. त्यादिवशी उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाऊ शकतात.>बंद दाराआडील चर्चा सार्वजनिक का?सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने ‘लाईन क्रॉस’ करून मीडियात वक्तव्ये केली त्यावरून अमित शहा हे अतिशय नाराज होते. त्यांच्या ६, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी अमित शहा हे अतिशय रागावलेले होते. बंद दाराआड झालेली चर्चा उद्धव ठाकरे हे मीडियासमोर का सांगत आहेत? यावरून ते नाराज होते. या बैठकीच्या गोपनीयतेबाबत त्यांनी एवढी काळजी घेतली होती की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुंबईतील या चर्चेत सहभागी करून घेतले नव्हते. या घडामोडींनंतर अमित शहा यांनी गप्प राहणेच पसंत केले. शिवसेना जेव्हा कमी जागा लढण्यासाठी तयार झाली, तर मग मुख्यमंत्रीपदावर ते दावा कसा काय करू शकतात? याचेही अमित शहा यांना आश्चर्य वाटले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे