शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

विना मुद्यांच्या काट्याच्या लढतीत कौल कुणाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:23 IST

राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही. 

रवी टाले - डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसदरम्यान काट्याची टक्कर दिसत असली, तरी निवडणुकीत मुद्यांचा मात्र सर्वथा अभाव जाणवतो. राज्यात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील प्रत्येक दहावा मतदार बेरोजगार आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्यांच्याशी बोलताना सतत जाणवते. आरोग्य सुविधांचा अभाव हादेखील एक मोठा मुद्दा आहे. विशेषतः पर्वतीय क्षेत्रात हा अत्यंत ज्वलंत विषय आहे. पर्वतीय भागातून राज्याच्या मैदानी भागात अथवा इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले स्थलांतर हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. पर्वतीय भागातील मानव-वन्य पशू संघर्ष हा पण गंभीर मुद्दा आहे. या प्रदेशाने १९७० च्या दशकात प्रसिद्ध गांधीवादी व पर्यावरणवादी चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखाली जंगलांच्या रक्षणासाठी ‘चिपको आंदोलन’ छेडले होते. त्यानंतर १९८० च्या दशकात सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणासाठी टेहरी धरणाच्या निर्मितीला प्राणांतिक विरोध केला होता. मात्र, त्याच प्रदेशात आज पर्यावरणाची अपरिमित हानी होताना दिसत असूनही, कुणीही आवाज उठवायला तयार नाही. सर्वसामान्य मतदारांना निवडणुकीच्या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न केला की, ते एक तर नरेंद्र मोदींची तोंड फाटेस्तोवर प्रशंसा करतात किंवा त्यांनी कसे देशाचे वाटोळे केले, हे समजावून सांगायला लागतात अथवा तोंडात मिठाची गुळणी धरतात. राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही. 

ज्वलंत मुद्दे इथे नाहीत-    उत्तराखंड दोन दशकांपूर्वी उत्तर प्रदेशचा भाग होता खरा; पण त्या राज्यातील मुद्दे उत्तराखंडमध्ये गैरलागू आहेत.-    उत्तर प्रदेश निवडणुकीतील कायदा व सुव्यवस्था, वीज पुरवठा हे ज्वलंत मुद्दे इथे नाहीत. -    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालावर शेतकरी आंदोलनाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र,उत्तराखंडमध्ये उधमसिंग नगर जिल्हा वगळता इतरत्र कुठेही तो मुद्दाच नाही. 

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेस