शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

विना मुद्यांच्या काट्याच्या लढतीत कौल कुणाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:23 IST

राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही. 

रवी टाले - डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसदरम्यान काट्याची टक्कर दिसत असली, तरी निवडणुकीत मुद्यांचा मात्र सर्वथा अभाव जाणवतो. राज्यात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील प्रत्येक दहावा मतदार बेरोजगार आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्यांच्याशी बोलताना सतत जाणवते. आरोग्य सुविधांचा अभाव हादेखील एक मोठा मुद्दा आहे. विशेषतः पर्वतीय क्षेत्रात हा अत्यंत ज्वलंत विषय आहे. पर्वतीय भागातून राज्याच्या मैदानी भागात अथवा इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले स्थलांतर हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. पर्वतीय भागातील मानव-वन्य पशू संघर्ष हा पण गंभीर मुद्दा आहे. या प्रदेशाने १९७० च्या दशकात प्रसिद्ध गांधीवादी व पर्यावरणवादी चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखाली जंगलांच्या रक्षणासाठी ‘चिपको आंदोलन’ छेडले होते. त्यानंतर १९८० च्या दशकात सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणासाठी टेहरी धरणाच्या निर्मितीला प्राणांतिक विरोध केला होता. मात्र, त्याच प्रदेशात आज पर्यावरणाची अपरिमित हानी होताना दिसत असूनही, कुणीही आवाज उठवायला तयार नाही. सर्वसामान्य मतदारांना निवडणुकीच्या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न केला की, ते एक तर नरेंद्र मोदींची तोंड फाटेस्तोवर प्रशंसा करतात किंवा त्यांनी कसे देशाचे वाटोळे केले, हे समजावून सांगायला लागतात अथवा तोंडात मिठाची गुळणी धरतात. राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही. 

ज्वलंत मुद्दे इथे नाहीत-    उत्तराखंड दोन दशकांपूर्वी उत्तर प्रदेशचा भाग होता खरा; पण त्या राज्यातील मुद्दे उत्तराखंडमध्ये गैरलागू आहेत.-    उत्तर प्रदेश निवडणुकीतील कायदा व सुव्यवस्था, वीज पुरवठा हे ज्वलंत मुद्दे इथे नाहीत. -    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालावर शेतकरी आंदोलनाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र,उत्तराखंडमध्ये उधमसिंग नगर जिल्हा वगळता इतरत्र कुठेही तो मुद्दाच नाही. 

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेस