शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण देश आज काश्मीर बनलाय; भाजपाच्या माजी मंत्र्यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:56 IST

पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. 

ठळक मुद्देतुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहेपोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतातपोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा झाला

नवी दिल्ली - भाजपाचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाती कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकास करु असा दावा सरकारने केला मात्र प्रत्यक्षात आता संपूर्ण देशात काश्मीरसारखी परिस्थिती उद्भवली आहे अशी टीका सिन्हा यांनी केली. 

यशवंत सिन्हा यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला ते संबोधित करत होते. सरकारने कलम ३७० आणि ३५ अ हटवला कारण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला जाईल. हे मतभेद दडपण्याचे तत्व आहे असा आरोप त्यांनी केला. 

संपूर्ण देश काश्मीर बनलायशवंत सिन्हा म्हणाले की, सरकारमधील लोकांनी दावा केला होता की ते काश्मीरला भारताच्या इतर राज्याप्रमाणे बनवतील, पण आज पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. जर कोणी काश्मीरमधील शोपियान, बारामुल्ला किंवा पुलवामा येथे गेले तर त्यांना सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त दिसेल. आणि आता अशीच परिस्थिती दिल्लीत निर्माण झाली आहे जिथे मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात असल्याचं दिसून येत असं माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले. 

पोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा. जेएनयू हिंसाचाराबद्दल यशवंत सिन्हा म्हणाले की तुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहे. यापूर्वी ते दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करत असत पण आता ते गुंडांचा वापर करत आहेत. ते म्हणाले की जेएनयूमध्ये जे काही झाले ते सरकारी पोलिस आणि सरकारी गुंडांमधील जो फरक होता तो संपला. पोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतात, ही संपूर्ण देशातील एक विचित्र परिस्थिती आहे अशी परखड टीकाही यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर केली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरjnu attackजेएनयूjamia protestजामियाPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार