शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

संपूर्ण देश आज काश्मीर बनलाय; भाजपाच्या माजी मंत्र्यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:56 IST

पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. 

ठळक मुद्देतुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहेपोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतातपोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा झाला

नवी दिल्ली - भाजपाचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाती कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकास करु असा दावा सरकारने केला मात्र प्रत्यक्षात आता संपूर्ण देशात काश्मीरसारखी परिस्थिती उद्भवली आहे अशी टीका सिन्हा यांनी केली. 

यशवंत सिन्हा यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला ते संबोधित करत होते. सरकारने कलम ३७० आणि ३५ अ हटवला कारण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला जाईल. हे मतभेद दडपण्याचे तत्व आहे असा आरोप त्यांनी केला. 

संपूर्ण देश काश्मीर बनलायशवंत सिन्हा म्हणाले की, सरकारमधील लोकांनी दावा केला होता की ते काश्मीरला भारताच्या इतर राज्याप्रमाणे बनवतील, पण आज पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. जर कोणी काश्मीरमधील शोपियान, बारामुल्ला किंवा पुलवामा येथे गेले तर त्यांना सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त दिसेल. आणि आता अशीच परिस्थिती दिल्लीत निर्माण झाली आहे जिथे मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात असल्याचं दिसून येत असं माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले. 

पोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा. जेएनयू हिंसाचाराबद्दल यशवंत सिन्हा म्हणाले की तुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहे. यापूर्वी ते दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करत असत पण आता ते गुंडांचा वापर करत आहेत. ते म्हणाले की जेएनयूमध्ये जे काही झाले ते सरकारी पोलिस आणि सरकारी गुंडांमधील जो फरक होता तो संपला. पोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतात, ही संपूर्ण देशातील एक विचित्र परिस्थिती आहे अशी परखड टीकाही यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर केली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरjnu attackजेएनयूjamia protestजामियाPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार