शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

संपूर्ण देश आज काश्मीर बनलाय; भाजपाच्या माजी मंत्र्यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:56 IST

पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. 

ठळक मुद्देतुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहेपोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतातपोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा झाला

नवी दिल्ली - भाजपाचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाती कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकास करु असा दावा सरकारने केला मात्र प्रत्यक्षात आता संपूर्ण देशात काश्मीरसारखी परिस्थिती उद्भवली आहे अशी टीका सिन्हा यांनी केली. 

यशवंत सिन्हा यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला ते संबोधित करत होते. सरकारने कलम ३७० आणि ३५ अ हटवला कारण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला जाईल. हे मतभेद दडपण्याचे तत्व आहे असा आरोप त्यांनी केला. 

संपूर्ण देश काश्मीर बनलायशवंत सिन्हा म्हणाले की, सरकारमधील लोकांनी दावा केला होता की ते काश्मीरला भारताच्या इतर राज्याप्रमाणे बनवतील, पण आज पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. जर कोणी काश्मीरमधील शोपियान, बारामुल्ला किंवा पुलवामा येथे गेले तर त्यांना सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त दिसेल. आणि आता अशीच परिस्थिती दिल्लीत निर्माण झाली आहे जिथे मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात असल्याचं दिसून येत असं माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले. 

पोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा. जेएनयू हिंसाचाराबद्दल यशवंत सिन्हा म्हणाले की तुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहे. यापूर्वी ते दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करत असत पण आता ते गुंडांचा वापर करत आहेत. ते म्हणाले की जेएनयूमध्ये जे काही झाले ते सरकारी पोलिस आणि सरकारी गुंडांमधील जो फरक होता तो संपला. पोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतात, ही संपूर्ण देशातील एक विचित्र परिस्थिती आहे अशी परखड टीकाही यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर केली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरjnu attackजेएनयूjamia protestजामियाPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार