शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:24 IST

केजरीवाल म्हणाले, "मी चार-पाच दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. त्यात मी त्यांच्याशी पाच मुद्द्यांवर बोललो. यातील एक मुद्दा म्हणजे..."

पंतप्रधान ज्या व्यक्तीवर घोटाळ्याचा आरोप करतात, त्यालाच राज्याचा डीसीएम बनवतात, असे म्हणत आप नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते शुक्रवारी दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दाही उपस्थित केला. 

केजरीवाल म्हणाले, "मी चार-पाच दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. त्यात मी त्यांच्याशी पाच मुद्द्यांवर बोललो. यातील एक मुद्दा असाही होता की, पंतप्रधान मोदींनी या देशातील सर्वात भ्रष्ट नेत्यांना ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून अथवा पैशांचे आमिष दाखवून इतर पक्षांपासून तोडून आपल्या पक्षात सहभागी करून घेत आहेत, याच्याशी आपण (मोहन भागवत) समहत आहात का?" 

यानंतर केजरीवाल म्हणाले, "27 जून 2023 रोजी पंतप्रधान म्हणाले होते, अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आम्ही यांना कारागृहात पाठवू. मात्र, पाच दिवसांनंतर 2 जुलैला त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घेतले आणि उपमुख्यमंत्री बनवले. मी त्यांना (भाजप) विचारू इच्छितो की, तुम्हाला काही ला** वाटते का… तुम्ही तुमच्या गल्लीत आणि घरात गेल्यावर काय तोंड दाखवता?"

केजरीवाल म्हणाले, "22 जुलै 2015 रोजी भाजप म्हणते, हिमंता बिस्वा सरमा मोठे भ्रष्टाचारी आहेत. एक महिन्यानंतर 23 ऑगस्ट 2015 रोजी त्यांना आपल्या पक्षात सहभागी करून घेतात." 

यानंतर, केजरीवाल म्हणाले, "एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर सीबीआय आणि ईडीची केस होती, पीएम मोदींनी बंद करवली. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची केस होती, ईओडब्ल्यूची केस होती, दोन्ही बंद करवल्या. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची केस होती, ती थंड बासनात टाकला. भावना गवाळींवर ईडीची केस होती. यशवंत जाधव यांच्यावरही ईडीची केस होती. एवढेच नाही तर, सीएम रमेश, रविंदर सिंह, संजय सेठ, सुवेंदू अधिकारी, के गीता, छगन भुजबल, कृपा शंकर सिंह, दिगंबर कामत, अशोक चव्हाण, नवीन जिंदल, तपस रे, अर्चना पाटिल, गीता कोडा, बाबा सिद्दिकी, ज्योती मिंडा, सुजाना चौधरी यांची नावे घेत, हा यांचा प्रामाणिकपणा आहे," असेही केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाAjit Pawarअजित पवार