शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:17 IST

हिंदू उत्तराधिकारी कायदा १९५६ च्या कलम १५(१)(ब) याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली

नवी दिल्ली - हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार वारसा संपत्तीचा अधिकार मिळण्यावरून दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. हिंदू समाजात कन्यादानाची परंपरा आहे. ज्यात महिलेचं लग्नानंतर गोत्र बदललं जाते. त्यामुळे मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती तिच्या सासरच्यांना दिली जाणार, माहेरच्यांना मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. 

हिंदू उत्तराधिकारी कायदा १९५६ च्या कलम १५(१)(ब) याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली. या कायद्यातंर्गत जर एखादी विधवा आणि मूलबाळ नसलेली महिला मृत्यूपत्र न बनवता तिचे निधन झाले असेल तर तिच्या संपत्तीचा अधिकार सासरच्यांना मिळतो. या सुनावणीवेळी एकमेव महिला न्यायाधीश बी.वी नागरत्ना यांनी सुनावणीवेळी म्हटलं की, आपल्या हिंदू समाजात ज्या प्रथा परंपरा आहेत, त्या अपमानित करू नका. महिलांना निश्चितच त्यांचा अधिकार मिळणे गरजेचे आहे. परंतु सामाजिक संरचना आणि महिलांच्या अधिकारात संतुलन असायला हवे. आमच्या निर्णयाने हजारो वर्ष सुरू असलेल्या परंपरेला छेद पडावा असं आम्हाला वाटत नाही असं त्यांनी सांगितले. 

सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी २ उदाहरणे देण्यात आली. त्यात पहिल्या प्रकरणात एका युवा जोडप्याचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला. त्यानंतर पती आणि पत्नी यांच्या संपत्तीवर दोघांच्या आईने दावा केला होता. पुरुषाच्या आईने जोडप्याच्या संपत्तीवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे असा दावा सांगितला तर महिलेच्या आईनेही मुलीच्या संपत्तीत वाटा हवा असं म्हटले. दुसऱ्या एका प्रकरणात जोडप्याच्या मृत्यूनंतर पुरुषाच्या बहिणीने त्यांच्या संपत्तीवर दावा केला होता. या जोडप्याला कुठलेही मूलबाळ नव्हते. यावर वकिलांनी हा जनहित याचिकेचा विषय असून सुप्रीम कोर्टाने दखल देण्याची आवश्यकता आहे असं म्हटले होते. 

न्या. बी.वी नागरत्ना आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सुनावणीस होते. त्यावेळी काही कठीण प्रकरणांमधील कठोर तथ्यांच्या आधारे कायदा बदलता येत नाही, कारण यामुळे हिंदू सामाजिक रचनेचे नुकसान होऊ शकते असं कोर्टाने म्हटले. महिलेच्या मृत्यूनंतर हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम १५ आणि १६ वर केंद्रित याचिकांवर हे निरीक्षण नोंदवण्यात आले. यानुसार, जर एखाद्या महिलेचा मृत्यूपत्र न बनवता निधन झाले असेल तर तिच्या संपत्तीवर पहिला अधिकार पती आणि मुलांचा असतो. मात्र पती आणि मूलबाळ नसेल तर या संपत्तीचा अधिकार पतीचे आई वडील किंवा भाऊ बहीण यांना मिळतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Childless Hindu woman's property goes to in-laws: Supreme Court clarifies.

Web Summary : Supreme Court says childless Hindu woman's property goes to in-laws, not parents. Citing Hindu tradition, the court heard challenges to Hindu Succession Act, balancing women's rights with social structure. Law favors husband's family if a woman dies intestate and childless.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHinduहिंदू