शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

बिहारचा मुख्यमंत्री कोण, निवडणूक झाल्यानंतर ठरणार; लोकसभेच्या फ्लोअर टेस्टपूर्वीच भाजप नेत्याने काडी टाकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 18:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही.

लोकसभेला बिहारमध्ये नितीशकुमार सोबतीला आले म्हणून भाजपाने यश मिळविले, नाहीतर एकही जागा आली नसती. यामुळे नितीशकुमारांच्याच नेतृत्वात राज्यातील निवडणूक लढविणार आणि तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार असे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले होते. याला काही दिवस उलटत नाही तोच भाजपाच्या नेत्याने बिहारचा मुख्यमंत्री कोण, निवडणूक झाल्यानंतर ठरणार असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही. नितीशकुमार इंडिया आघाडीची स्थापना करून ऐनवेळी भाजपासोबत आले आणि सगळे वारे फिरले होते. यातच विरोधक नितीशकुमार आणि भाजपात कधी एकदा बिनसते आणि ते बंडखोरी करतात याकडे डोळे लावून आहेत. 

या पार्श्वभूमीवर भागलपूरमध्ये भाजपा नेते अश्विनीकुमार चौबे यांनी नितीशकुमार नाराज होतील असे वक्तव्य केले आहे. बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार बनावे अशी माझी इच्छा आहे आणि मी ते केंद्रीय नेतृत्वालाही कळविले आहे. पूर्ण बहुमताने भाजपा एकट्याच्या जिवावर सत्तेत यायला हवी. सहकाऱ्यांनाही पुढे घेऊन जावे. यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे चौबे म्हणाले. 

मला वाटतेय की आम्ही नितीशकुमारांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. आजही आणि उद्याही पुढे जाऊ. परंतू निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरविला जाईल. पक्ष आणि केंद्रीय नेते हे ठरवतील. परंतू पक्षात आयात माल आम्ही कधीही सहन करणार नाही. यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनेचाच मूळ व्यक्ती असायला हवा, असे वक्तव्य चौबे यांनी केले आहे. 

टॅग्स :Biharबिहारlok sabhaलोकसभाNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा