शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा मुख्यमंत्री कोण, निवडणूक झाल्यानंतर ठरणार; लोकसभेच्या फ्लोअर टेस्टपूर्वीच भाजप नेत्याने काडी टाकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 18:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही.

लोकसभेला बिहारमध्ये नितीशकुमार सोबतीला आले म्हणून भाजपाने यश मिळविले, नाहीतर एकही जागा आली नसती. यामुळे नितीशकुमारांच्याच नेतृत्वात राज्यातील निवडणूक लढविणार आणि तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार असे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले होते. याला काही दिवस उलटत नाही तोच भाजपाच्या नेत्याने बिहारचा मुख्यमंत्री कोण, निवडणूक झाल्यानंतर ठरणार असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही. नितीशकुमार इंडिया आघाडीची स्थापना करून ऐनवेळी भाजपासोबत आले आणि सगळे वारे फिरले होते. यातच विरोधक नितीशकुमार आणि भाजपात कधी एकदा बिनसते आणि ते बंडखोरी करतात याकडे डोळे लावून आहेत. 

या पार्श्वभूमीवर भागलपूरमध्ये भाजपा नेते अश्विनीकुमार चौबे यांनी नितीशकुमार नाराज होतील असे वक्तव्य केले आहे. बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार बनावे अशी माझी इच्छा आहे आणि मी ते केंद्रीय नेतृत्वालाही कळविले आहे. पूर्ण बहुमताने भाजपा एकट्याच्या जिवावर सत्तेत यायला हवी. सहकाऱ्यांनाही पुढे घेऊन जावे. यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे चौबे म्हणाले. 

मला वाटतेय की आम्ही नितीशकुमारांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. आजही आणि उद्याही पुढे जाऊ. परंतू निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरविला जाईल. पक्ष आणि केंद्रीय नेते हे ठरवतील. परंतू पक्षात आयात माल आम्ही कधीही सहन करणार नाही. यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनेचाच मूळ व्यक्ती असायला हवा, असे वक्तव्य चौबे यांनी केले आहे. 

टॅग्स :Biharबिहारlok sabhaलोकसभाNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा