शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:03 IST

Gopal Patha News: देशात फाळणीचे वारे वाहू लागल्यानंतर १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली होती. त्यानंतर पुढचे चार दिवसा कोलकात्यामध्ये भीषण दंगल उसळली होती. त्यात सुमारे ८ ते १० हजार लोक मारले गेले होते. याच दंगलीदरम्यान, एक नाव समोर आले होते ते म्हणजे गोपाळ पाठा. 

भारताच्या इतिहासामध्ये १९४७ साली झालेली देशाची फाळणी हा काळा अध्याय मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद असता तरी तेव्हा देशवासियांना कधीही न भरून येणाऱ्या फाळणीचे घाव सोसावे लागले होते. याचदरम्यान, देशात फाळणीचे वारे वाहू लागल्यानंतर १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली होती. त्यानंतर पुढचे चार दिवसा कोलकात्यामध्ये भीषण दंगल उसळली होती. त्यात सुमारे ८ ते १० हजार लोक मारले गेले होते. याच दंगलीदरम्यान, एक नाव समोर आले होते ते म्हणजे गोपाळ पाठा. 

मुस्लिम लीगने केलेल्या डायरेक्ट अॅक्शन डेच्या आवाहनानंतर बंगालमध्ये १६ ऑगस्ट १९४६ रोजी दंगल भडकली होती. तसेच ही दंगल पुढे देशभरात पसरली होती. या दंगलींदरम्यान कलकत्त्यामध्ये मुस्लिम आणि हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. शहर कट्टरतावाद्यांच्या ताब्यात आलं. त्यांनी मोठ्या प्रमाणावहर हत्या आणि विध्वंसाची मालिका सुरू केली. त्याचवेळी बंगालचा तेव्हाचा मुख्यमंत्री हुसेन शाहीद सुहरावर्दी याने सशस्त्र मुस्लिमांविरोधात कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन दिलं. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली.

याच अराजकादरम्यान, गोपालचंद्र मुखर्जी हे नाव समोर आलं. त्यांना गोपाल पाठा या नावानेही ओळखलं जातं. कलकत्त्यामधील एका समुहाचे नेते असलेल्या गोपाल मुखर्जी यांनी हिंसक मुस्लिम जमावाला रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. गोपाल मुखर्जी यांच्या प्रयत्नांमुळे अनेक हिंदू  मृत्यू आणि अपमानापासून वाचले, असा दावा केला जातो. त्यामुळे एक वर्ग त्यांच्याकडे महापुरुष म्हणून पाहतो. मात्र मोठ्या प्रमाणात हिंसाचार केल्याने त्यांना इतिहासात खलपुरुष म्हणूनही ओळखलं जातं.

दरम्यान, कोलकात्यामध्ये १६ ऑगस्ट १९४६ ते २० ऑगस्ट १९४६ दरम्यान, झालेल्या भीषण दंगलीनंतर कलकत्त्यासह बंगालचा मोठा भूभाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्याचा मुस्लिम लीगचा डाव यशस्वी होणार नाही हे स्पष्ट झालं होत. या भीषण संघर्षानंतर मुस्लिम लीगने हत्याकांड थांबवण्याचं आवाहन गोपाळ मुखर्जी यांना केलं. मात्र मुस्लिम लीगने आधी आपल्या कार्यकर्त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगावे अशी अट घातली. त्यामुळे कलकत्ता हे प्रमुख शहर पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यामध्ये जे घटक कारणीभूत ठरले, त्यामध्ये गोपाल मुखर्जी यांनी दिलेलं आक्रमक प्रत्युत्तर हे ही एक असल्याचे सांगितले जाते. मात्र असं असलं तरी हिंसक कृत्यांमुळे त्यांचा इतिहासात व्हिलन अशाही उल्लेख केला जातो.  

टॅग्स :Indiaभारतwest bengalपश्चिम बंगालhindiहिंदीMuslimमुस्लीम