शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:03 IST

Gopal Patha News: देशात फाळणीचे वारे वाहू लागल्यानंतर १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली होती. त्यानंतर पुढचे चार दिवसा कोलकात्यामध्ये भीषण दंगल उसळली होती. त्यात सुमारे ८ ते १० हजार लोक मारले गेले होते. याच दंगलीदरम्यान, एक नाव समोर आले होते ते म्हणजे गोपाळ पाठा. 

भारताच्या इतिहासामध्ये १९४७ साली झालेली देशाची फाळणी हा काळा अध्याय मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद असता तरी तेव्हा देशवासियांना कधीही न भरून येणाऱ्या फाळणीचे घाव सोसावे लागले होते. याचदरम्यान, देशात फाळणीचे वारे वाहू लागल्यानंतर १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली होती. त्यानंतर पुढचे चार दिवसा कोलकात्यामध्ये भीषण दंगल उसळली होती. त्यात सुमारे ८ ते १० हजार लोक मारले गेले होते. याच दंगलीदरम्यान, एक नाव समोर आले होते ते म्हणजे गोपाळ पाठा. 

मुस्लिम लीगने केलेल्या डायरेक्ट अॅक्शन डेच्या आवाहनानंतर बंगालमध्ये १६ ऑगस्ट १९४६ रोजी दंगल भडकली होती. तसेच ही दंगल पुढे देशभरात पसरली होती. या दंगलींदरम्यान कलकत्त्यामध्ये मुस्लिम आणि हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. शहर कट्टरतावाद्यांच्या ताब्यात आलं. त्यांनी मोठ्या प्रमाणावहर हत्या आणि विध्वंसाची मालिका सुरू केली. त्याचवेळी बंगालचा तेव्हाचा मुख्यमंत्री हुसेन शाहीद सुहरावर्दी याने सशस्त्र मुस्लिमांविरोधात कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन दिलं. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली.

याच अराजकादरम्यान, गोपालचंद्र मुखर्जी हे नाव समोर आलं. त्यांना गोपाल पाठा या नावानेही ओळखलं जातं. कलकत्त्यामधील एका समुहाचे नेते असलेल्या गोपाल मुखर्जी यांनी हिंसक मुस्लिम जमावाला रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. गोपाल मुखर्जी यांच्या प्रयत्नांमुळे अनेक हिंदू  मृत्यू आणि अपमानापासून वाचले, असा दावा केला जातो. त्यामुळे एक वर्ग त्यांच्याकडे महापुरुष म्हणून पाहतो. मात्र मोठ्या प्रमाणात हिंसाचार केल्याने त्यांना इतिहासात खलपुरुष म्हणूनही ओळखलं जातं.

दरम्यान, कोलकात्यामध्ये १६ ऑगस्ट १९४६ ते २० ऑगस्ट १९४६ दरम्यान, झालेल्या भीषण दंगलीनंतर कलकत्त्यासह बंगालचा मोठा भूभाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्याचा मुस्लिम लीगचा डाव यशस्वी होणार नाही हे स्पष्ट झालं होत. या भीषण संघर्षानंतर मुस्लिम लीगने हत्याकांड थांबवण्याचं आवाहन गोपाळ मुखर्जी यांना केलं. मात्र मुस्लिम लीगने आधी आपल्या कार्यकर्त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगावे अशी अट घातली. त्यामुळे कलकत्ता हे प्रमुख शहर पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यामध्ये जे घटक कारणीभूत ठरले, त्यामध्ये गोपाल मुखर्जी यांनी दिलेलं आक्रमक प्रत्युत्तर हे ही एक असल्याचे सांगितले जाते. मात्र असं असलं तरी हिंसक कृत्यांमुळे त्यांचा इतिहासात व्हिलन अशाही उल्लेख केला जातो.  

टॅग्स :Indiaभारतwest bengalपश्चिम बंगालhindiहिंदीMuslimमुस्लीम