शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कोण आहेत 'ते' अधिकारी, का पुकारलंय ममता बॅनर्जींनी त्यांच्यासाठी धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 10:20 IST

पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देममता बॅनर्जींचे केंद्र सरकारविरोधात बंडसीबीआय आणि स्थानिक पोलिसांमध्ये संघर्षकेंद्र सरकारची दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही - ममता बॅनर्जी

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी संध्याकाळी (3 फेब्रुवारी) केंद्रीय अन्वेषण विभागानं कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापेमारी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरुन मोठा वादंग निर्माण झाला.

शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी आयुक्तांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरच रोखले आणि  त्यांना शेजारच्या पोलीस ठाण्यात नेऊन अडकवून ठेवले. या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताने परिसरात तणाव वाढला.  

या सर्व घडामोडींदरम्यान, खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरल्या. ममत बॅनर्जी सुरुवातीस राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आणि त्यानंतर कोलकाता शहराच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात त्यांनी रात्रीच धरणे आंदोलन सुरू केले. याठिकाणी राजीव कुमारदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

 

पण, ममता बॅनर्जी ज्या पोलीस अधिकाऱ्यासाठी रात्रीपासून धरणे आंदोलनास बसल्या आहेत, ते आहेत तरी कोण हे जाणून घेऊया. 

कोण आहेत राजीव कुमार? कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार हे ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे विश्वसनीय मानले जातात. 2016 मध्ये सुरजीत कर पुरकायस्थ यांच्या जागी कुमार यांची कोलकाताच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर पुरकायस्थ यांना सीआयडी विभागात बढती देण्यात आली. -1989 बॅचमधील पश्चिम बंगाल कॅडरचे आयपीएस अधिकारी  - कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्ट फोर्सचे होते प्रमुख- शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांचे तपास अधिकारी होते. हा घोटाळा 2013 साली उघडकीस आला होता. 

सीबीआयला नोंदवायचा आहे जबाबया घोटाळ्यांमधील महत्त्वपूर्ण फायली आणि दस्तावेज कथित स्वरुपात गहाळ झाल्याने सीबीआयनं राजीव कुमार आणि अन्य अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. पण यातील एकही अधिकारी सीबीआयसमोर हजर झाला नाही. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कित्येक नेत्यांवरही आरोप आहे. या घोटाळ्यांमुळे तृणमूल काँग्रेस नेत्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे.  

 

राजीव कुमार प्रामाणिक अधिकारी - ममता बॅनर्जीराजीव कुमार हे जगातील सर्वोत्तम प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. ते 24 तास आपले कर्तव्य पार पाडत असतात, असे ट्विट करत ममता बॅनर्जींना कुमार यांना आपला पाठिंबा दर्शवला. शिवाय, केंद्र सरकारची दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही, असेही ट्विट ममता यांनी करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. \

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीCBIगुन्हा अन्वेषण विभाग