शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? आमच्यात वाद नको! काँग्रेस आमदार एका ओळीचा प्रस्ताव संमत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 15:57 IST

2013 मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री पदी कोणालाच नेमले नव्हते. कारण...

कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील भाजपाने केलेले राजकारण पाहता यावेळी कर्नाटकात काँग्रेस कमालीची सावध झालेली आहे. आमदारांना रातोरात बंगळुरुला हलविण्यासाठी चार्टर्ड प्लेन तयार ठेवण्यात आली आहेत. अशातच उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री कोण असावा, मंत्री कोण असतील आदीवर चर्चा केली जाणार आहे. 

निवडणूक आयोगानुसार काँग्रेस १३७ पैकी १०१ जागांवर आघाडीवर तर ३६ जागा जिंकली आहे. भाजपा ४५ जागांवर आघाडीवर असून १७ जागा जिंकल्या आहेत. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी ११३ जागांची आवश्यकता आहे. यामुळे २-४ जागा कमी अधिक झाल्या तरी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. काँग्रेसमध्ये तसे दोन गट आहेत. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्याच स्पर्धा असते. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार यावरून पुन्हा मध्य प्रदेश, राजस्थानसारखे राजकारण व्हायला नको म्हणून आमदारांनीच सावध भूमिका घेण्याचे ठरविले आहे. 

उद्याच्या बैठकीत एका ओळीचा प्रस्ताव पास करून मुख्यमंत्री कोण असणार याची निवड हायकमांडनेच करण्याचे निश्चित करण्यात येणार असल्याचे समजते. २०१३ मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री नेमला नव्हता. यावेळी दुसऱ्या गोटात धुसफुस होती. २०१८ मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा कोणालाच बहुमत मिळाले नव्हते. यामुळे जेडीएससोबत काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. तेव्हा शिवकुमार यांनी आमदारांना सांभाळण्याची भूमिका पार पाडली होती. जेव्हा सरकार कोसळले तेव्हा देखील त्यांनीच संकटमोचकाची भूमिका पार पाडली होती. 

शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यामुळे या दोन्ही हेवीवेट नेत्यांमधून एकाची निवड करणे हायकमांडला जड जाणार आहे. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद दिले तर प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची निवड करायची याचाही पेच असणार आहे. शिवाय आणखी वर्षभराने लोकसभेची निवडणूक येऊ घातली आहे. काँग्रेसने आमदारांचे मत जाणण्यासाठी दिल्लीतून निरीक्षक पाठविले आहेत. शिवाय काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे देखील याच राज्याचे आहेत. यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा तिढा काँग्रेसला सोडविणे कठीण जाणार आहे. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस