शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:54 IST

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

नवी दिल्ली-

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी कोण संजय राऊत? रोजच टीका करणाऱ्यांना मी महत्व देत नाही, असा टोला लगावला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. 

"संजय राऊत रोजच टीका करत असतात. त्यांना आम्ही महत्व देत नाही. ते कोण आहेत एवढे? ते काही महत्वाचे व्यक्ती नाहीत. त्यांच्या प्रश्नांना मी का उत्तर देऊ? तुमच्याकडे काही स्वत:चे प्रश्न असतील तर विचारा. त्यावर मी बोलेन", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला. 

"ज्ञानवापीचा विषय आस्थेचा विषय आहे आणि असे विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात. देशात हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जातात. आज न्यायालयनं त्याठिकाणी कोर्ट-कमिश्नरची नियुक्ती केली आहे. त्यांचा जो रिपोर्ट येईल त्याआधारे कोर्ट निर्णय देईल. तो निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. सध्या न्यायालयात हे प्रकरण असल्यानं त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही", असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?"खरंतर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी. अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यावर आता अशाप्रकारचे प्रश्न सामोपचाराने सुटले पाहिजेत. पण ताजमहालच्या खाली काय आहे? जामा मशिदीच्या खाली काय आहे? यातच सगळा वेळ चालला आहे. पण महागाईवर कुणी बोलत नाही. बेरोजगारीवर कुणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर आणि नावं बदलणं यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. ज्ञानवापी मशिदीचा वाद म्हणजे २०२४ च्या निवडणुकीची तयारी तर नाही ना? मशिदीत खोदकाम करण्यापेक्षा कैलास मानस पर्वत मिळवा", असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतMosqueमशिदGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीद