शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:54 IST

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

नवी दिल्ली-

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी कोण संजय राऊत? रोजच टीका करणाऱ्यांना मी महत्व देत नाही, असा टोला लगावला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. 

"संजय राऊत रोजच टीका करत असतात. त्यांना आम्ही महत्व देत नाही. ते कोण आहेत एवढे? ते काही महत्वाचे व्यक्ती नाहीत. त्यांच्या प्रश्नांना मी का उत्तर देऊ? तुमच्याकडे काही स्वत:चे प्रश्न असतील तर विचारा. त्यावर मी बोलेन", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला. 

"ज्ञानवापीचा विषय आस्थेचा विषय आहे आणि असे विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात. देशात हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जातात. आज न्यायालयनं त्याठिकाणी कोर्ट-कमिश्नरची नियुक्ती केली आहे. त्यांचा जो रिपोर्ट येईल त्याआधारे कोर्ट निर्णय देईल. तो निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. सध्या न्यायालयात हे प्रकरण असल्यानं त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही", असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?"खरंतर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी. अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यावर आता अशाप्रकारचे प्रश्न सामोपचाराने सुटले पाहिजेत. पण ताजमहालच्या खाली काय आहे? जामा मशिदीच्या खाली काय आहे? यातच सगळा वेळ चालला आहे. पण महागाईवर कुणी बोलत नाही. बेरोजगारीवर कुणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर आणि नावं बदलणं यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. ज्ञानवापी मशिदीचा वाद म्हणजे २०२४ च्या निवडणुकीची तयारी तर नाही ना? मशिदीत खोदकाम करण्यापेक्षा कैलास मानस पर्वत मिळवा", असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतMosqueमशिदGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीद