शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

I.N.D.I.A.च्या पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपचा विजय कसा झाला? ममता बॅनर्जींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:11 IST

महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

तृनमूल काँग्रेसच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसवर थेट टीका केली आहे. गेल्या लोकसभान निवडणुकीत भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचला, यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेसच्या चुकांमुळेच I.N.D.I.A.ला निवडणुकीत यश मिळाले नाही आणि भाजपला बहुमताशिवाय सत्तेत जाण्याची संधी मिळाली, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटेल आहे.

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी कोलकाता अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात तीन नवी पुस्तके लॉन्च केली. या पुस्तकांपैकी एका पुस्तकाचे नाव 'Banglar Nirbachon o Amra', असे आहे. या पुस्तकात त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाला संदर्भात आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.

"काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीच्या नेत्याचे पद देण्यात आले. पण..." -आपल्या पुस्तकात ममता बॅनर्जी यानी म्हटले आहे की, “सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून आम्ही भारतीय जनता पक्षाविरुद्ध एक मजबूत विरोधी आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही सुरुवातीपासूनच एक समान किमान कार्यक्रम आणि समान जाहीरनाम्यासाठी आग्रही होतो. विरोधी आघाडीचे नावही माझाच प्रस्ताव होता. काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीच्या नेत्याचे पद देण्यात आले. परंतु असे असतानाही, ना किमान समान कार्यक्रम होता, ना समान जाहीरनामा होता. आघाडीतील सदस्य आपापसात निवडणूक शर्यत करत होते. याचा फायदा भाजपला झाला आणि बहुमत नसतानाही ते सत्तेत परतण्यात यशस्वी झाले...

महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा