शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

I.N.D.I.A.च्या पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपचा विजय कसा झाला? ममता बॅनर्जींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:11 IST

महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

तृनमूल काँग्रेसच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसवर थेट टीका केली आहे. गेल्या लोकसभान निवडणुकीत भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचला, यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेसच्या चुकांमुळेच I.N.D.I.A.ला निवडणुकीत यश मिळाले नाही आणि भाजपला बहुमताशिवाय सत्तेत जाण्याची संधी मिळाली, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटेल आहे.

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी कोलकाता अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात तीन नवी पुस्तके लॉन्च केली. या पुस्तकांपैकी एका पुस्तकाचे नाव 'Banglar Nirbachon o Amra', असे आहे. या पुस्तकात त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाला संदर्भात आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.

"काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीच्या नेत्याचे पद देण्यात आले. पण..." -आपल्या पुस्तकात ममता बॅनर्जी यानी म्हटले आहे की, “सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून आम्ही भारतीय जनता पक्षाविरुद्ध एक मजबूत विरोधी आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही सुरुवातीपासूनच एक समान किमान कार्यक्रम आणि समान जाहीरनाम्यासाठी आग्रही होतो. विरोधी आघाडीचे नावही माझाच प्रस्ताव होता. काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीच्या नेत्याचे पद देण्यात आले. परंतु असे असतानाही, ना किमान समान कार्यक्रम होता, ना समान जाहीरनामा होता. आघाडीतील सदस्य आपापसात निवडणूक शर्यत करत होते. याचा फायदा भाजपला झाला आणि बहुमत नसतानाही ते सत्तेत परतण्यात यशस्वी झाले...

महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा