शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 9:47 AM

K Surendran vs Rahul Gandhi: भाजपने के सुरेंद्रन यांना मैदानात उरवल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित केलेल्या उमेदवाराची चर्चा अधिक आहे. तर जाणून घेऊयात, कोण आहेत केरळ भाजपाध्यक्ष? का सुरू आहे त्यांची एवढी चर्चा...?

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वायनाडमधून प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. सुरेंद्रन मैदानात उरल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित केलेल्या उमेदवाराची चर्चा अधिक आहे. तर जाणून घेऊयात, कोण आहेत केरळ भाजपाध्यक्ष? का सुरू आहे त्यांची एवढी चर्चा...? केरळ भाजपाध्यक्ष के. सुरेंद्रन -- के. सुरेंद्रन हे नॉर्थ केरळमधील एक मोठे नेते आहेत. ते 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.  - गेल्यावेळी त्यांनी पथानामथिट्टा (Pathanamthitta) या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.- 2018 मध्ये सबरीमाला आंदोलनावेळी सुरेंद्रन यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी ते एका महिन्याहूनही अधिक काळ जेलमध्ये होते.- के. सुरेंद्रन यांनी  2021 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर निवडणूक लढली होती. मात्र या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला.- यावेळी सुरेंद्रन संपूर्ण तयारीत आहेत. उमेदवारी घोषित झाल्यानंतर, त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत आणि राहुल गांधींचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले, 'मला हे सांगताना आनंद होत आहे की, भाजपने वायनाडमध्ये इंडी अलायन्सचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एनडीएचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली.'

वायनाडमध्ये अशी होणार फाइट -विरोधी पक्षांनी I.N.D.I.A. नावाने आघाडी तयार केली असली तरी, काँग्रेस आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला सीपीआय या दोघांनीही वायनाडमधून आपापले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. सीपीआयने ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे राहुल गांधींच्या मतांमध्ये विभाजनाचा धोका आहे. महत्वाचे म्हणजे, वायनाड हा रायबरेली आणि अमेठीप्रमाणेच काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जातो. येथे गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे.

राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत वायनाडमध्ये सीपीआयच्या उमेदवाराचा 4.31 लाख मतांनी पराभाव केला होता. यावेळी, भाजपच्या उमेदवाराला केवळ 78,000 मतेच मिळाली होती आणि तो तिसऱ्या स्थानावर होता. मात्र यावेळी सुरेंद्रन हे राहुल गांधी यांना कडवे आव्हान देऊ शकतात, अशी आशा भाजपला आहे. 

टॅग्स :Keralaकेरळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी