शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बिहारमध्ये एनडीएचा चेहरा कोण? घटक पक्षांमध्ये सुरू झाली धुसफूस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 19:03 IST

2019 साली होणाऱ्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकीय पक्षांमध्ये शह आणि काटशहाचे खेळही सुरू झाले आहेत.

नवी दिल्ली - 2019 साली होणाऱ्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकीय पक्षांमध्ये शह आणि काटशहाचे खेळही सुरू झाले आहेत. एकीकडे मोदींविरोधात विरोधकांची एकजूट उभी राहत असतानाच एनडीएमधील घटक पक्षांना सोबत ठेवण्याचा आव्हान भाजपासमोर आहे. त्यातच भाजपाला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या बिहारमध्ये 2019 च्या निवडणुकीत एनडीएचा चेहरा कोण असेल यावरून घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवामुळे भाजापचे मित्रपक्ष आपली उपयुक्तता सिद्ध करून आघाडीमध्ये अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. गुरुवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीपूर्वीच जेडीयूने बिहारमध्ये नितीश कुमार हेच एनडीएचा चेहरा असतील अशी केलेली घोषणा ही त्याचाच एक भाग आहे. आता 2014 साली मोदींचा चेहरा पुढे करून बिहारमध्ये निवडणुकीस सामोरी जाणारी भाजपा जेडीयूच्या या प्रस्तावाला स्वीकारणार का हा सवालच आहे.   दुसरीकडे बिहारमध्ये एनडीएमधील अजून एक महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने पुढील लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार नव्हे तर नरेंद्र मोदीच एनडीएचा चेहरा असतील, असे स्पष्ट केले आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या या भूमिकेमुळे बिहारमध्ये एनडीएच्या घटक पक्षांमध्येच आघाडीवरून खडाखडी होण्याची शक्यता बळावली आहे. लोकसभेच्या 40 जागा असलेल्या बिहारमध्ये जेडीयूला एनडीएत मोठ्या भावाचे स्थान हवे आहे.  तसेच त्यांनी त्या दृष्टीने दावेदारी करून भाजपाला आपले म्हणणे मान्य करण्यास भाग पाडण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी 2019 साली बिहारमध्ये नरेद्र मोदीच चेहरा असतील, असे सांगून तिढा वाढवला आहे.   

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार